शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मोटरमनची जागा हुकली, प्रवाशाच्या आयुष्याची दोरी तुटली; सिंहगड एक्स्प्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2024 10:43 IST

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रवासी दररोज सिंहगड एक्स्प्रेसने मुंबई-पुणे असा प्रवास करतात. पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्याची सोय केली आहे...

पिंपरी :पिंपरीरेल्वेस्थानकात सकाळी ६:३० वाजेची वेळ. नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी. पुण्याहून मुंबईकडे निघालेली सिंहगड एक्स्प्रेस वेगाने फलाटावर आली. जिथे पिंपरीतील प्रवाशांसाठी डबा असतो, तिथे ट्रेन न थांबवताच मोटरमनने पुढे नेली आणि जागा पकडण्यासाठी सर्व प्रवाशांची एकच धावाधाव झाली. याचवेळी डबा पकडण्याच्या प्रयत्नात एकाचा जीव गेला. अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव ‘फतिमल गुडेला’ नाव आहे.

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रवासी दररोज सिंहगड एक्स्प्रेसने मुंबई-पुणे असा प्रवास करतात. पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्याची सोय केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या आणि प्रवाशांच्या तुलनेत डब्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जागेसाठी अनेकदा प्रवाशांमध्ये वाद होतात. जागा पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.

काय घडले?

शुक्रवारी सकाळी ६:३० वाजेला पिंपरी स्थानकात गाडी वेगात आली. नियमानुसार फलाटावर गाडी येताना मोटरमनने वेगमर्यादा पाळली नाही. डबा पुढे गेला. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी धावताना फतिमल गुडेला खाली पडले. ते गाडीखाली गेले. त्यावेळी गाडी थांबविण्यात आली. त्यांना तातडीने वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वेगाने आणली जाते ट्रेन

पिंपरी, चिंचवड व लोणावळा या स्थानकांकरिता सिंहगड एक्स्प्रेसला स्वतंत्र डबे असल्यामुळे सर्व प्रवाशांची त्यात चढण्याकरता चढाओढ असते. त्यात भर म्हणजे या स्थानकांत सिंहगड एक्स्प्रेस अत्यंत वेगात आणली जाते आणि अचानक थांबवली जाते. बऱ्याच वेळा आपल्या नियोजित जागी न थांबता ती दोन ते तीन डबे पुढे थांबते. यामुळे ऐनवेळेस प्रवाशांची प्रचंड धावपळ होते. यामध्ये प्रवासी पडून जखमी होतात, तसेच एकाच वेळी गर्दी झाल्यामुळे मोबाइल, पाकीटचोर गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करतात. नवखे प्रवासी बऱ्याच वेळा चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अंदाज चुकल्यामुळे खाली पडतात. काही अंतर फरफटत जातात. नाहीतर गाडीच्या आणि फलाटामधील जागेत पडतात, असे नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

सावधान, कोणीतरी आपली वाट पाहतेय!

अपघातानंतर रेल्वे प्रवाशांत गुडेला यांच्या अपघाती मृत्यूची चर्चा होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले गेले की, ‘माझ्या सर्व मित्रांनो, हृदयाच्या अंत:करणातून कळकळीची विनंती आहे की, आपला जीव अमूल्य, अनमोल आहे. आपल्यावर कुटुंबातील आई, वडील, मुले, बहिणी, भाऊ व इतर सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे रोज सकाळी सिंहगड गाडी पकडताना घाई गडबड, गोंधळ अजिबात करू नका. स्वतःची व इतरांची काळजी घेऊन गाडीमध्ये प्रवेश करा.’

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpimpri-acपिंपरी