शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके

By राजू हिंगे | Updated: November 25, 2024 21:01 IST

हाके म्हणाले,'जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.'

पुणे : राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल ही मनोज जरांगे-पाटील यांना चपराक आहे. यंदाच्या निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हाके म्हणाले, जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पावले उचलली. ती सर्वांनाच मान्य होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे होते. हा त्यांचा हेकेखोरपणा आहे. मराठा समाजात जागरूकता निर्माण करण्याऐवजी जरांगे राजकारण खेळू लागले. ठराविक पक्षाला निवडून आणा, ठराविक पक्षाचे उमेदवार पाडा, ही त्यांची भूमिका नागरिकांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केलेले उमेदवारही विविध ठिकाणी सहज निवडून आले, असे हाके यांनी सांगितले. मला मंत्री करावेराज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, यामध्ये ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मी राज्यभर दौरे केले. त्याचा उपयोग महायुतीला झाला. त्यामुळे माझ्या क्षमता लक्षात घेऊन मला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. केवळ विधान परिषदेवर जाण्यात मला स्वारस्य नाही, अशी मागणी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेlaxman hakeलक्ष्मण हाकेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणMahayutiमहायुती