शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क

By नितीन चौधरी | Updated: February 14, 2024 15:02 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार

पुणे : मतदानाचा प्रत्यक्ष व अचुक आकडा वेेळेत मिळावा यासाठी राज्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांना आता सशक्त मोबाईल नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यात सर्वाधिक दुर्गम मतदान केंद्र सिधुदुर्ग जिल्ह्यात १६५ इतकी असून त्याखालोखाल नंदूरबारमध्ये १५० तर रत्नागिरीमध्ये १४८ मतदान केंद्र आहेत.

निवडणूक प्रक्रिया सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बनली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अनेक मोबाईल ॲपमधून माहिती मुख्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोचवावी लागते. मात्र, दुर्गम भागातील निवडणूक केंद्रांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने या भागातील माहिती वेळेत पोचू शकत नाही. परिणामी मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी काढण्यासाठी अडचणी येतात. तसेच अशा मतदान केंद्रावर मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे तेथील समस्या सोडविण्यासाठी वेळ लागतो. यावर तोडगा म्हणून राज्यातील अशा दुर्गम मतदान केंद्रांवरील सशक्त मोबाईल नेटवर्क लावण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दूरसंचार विभागाला मोबाईल नेटवर्क सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

या ठिकाणी मोबाईल नेटवर्क कव्हरेज नसल्याने आतापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना उपग्रह फोनचा वापर करावा लागत होता केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा मतदान केंद्रांना व्हाईस शॅडो झोन अर्थात फोन कॉलमध्ये अडथळा आणणारे क्षेत्र तसेच इंटरनेट शॅडो झोन अर्थात मोबाईल कनेक्टिव्हिटी अत्यंत कमी असणारे अशा दोन भागात विभागणी केली आहे. त्यानुसार व्हाईस शॅडो झोनमध्ये राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांना आता तात्पुरते सशक्त मोबाईल नेटवर्क देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दूरसंचार विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे.

सशक्त मोबाईल नेटवर्कमुळे या मतदान केंद्रांवरील मतदानाची दर दोन तासांनी मिळणारी माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकणार आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी मतदान संपल्यानंतर तातडीने उपलब्ध होऊ शकणार आहे. - श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

जिल्हा दुर्गम मतदान केंद्र संख्या

सिंधुदुर्ग १६५, नंदूरबार १५०, रत्नागिरी १४८, नाशिक १०३, गडचिरोली ८८, रायगड ७९ ,अमरावती ७२, नगर ६४, पुणे ५३, कोल्हापूर ४७, चंद्रपूर ३७, पालघर ३३, गोंदिया ३२, धुळे ३२, सातारा ३०, बुलढाणा २७, यवतमाळ २६, छत्रपती संभाजीनगर २१, जळगाव १५, लातूर ११, सांगली ३, वर्धा २, ठाणे १, बीड १

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocialसामाजिकVotingमतदान