शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

Subhas Chandra Bose: सरकार दरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:08 AM

धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत....

पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राजकारणातील झंझावात होते. बोस यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतची कुजबुज आजही समाजात कानावर पडते. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतची संदिग्धता संपुष्टात आणून सरकार दरबारी त्यांच्या मृत्यूच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी, अशी मागणी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी केली.

अण्णाभाऊ साठे सभागृह येथे प्रथमेश गोसावी, आशुतोष नर्लेकर आणि संजय गोसावी यांनी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत.

यावेळी त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास पुणेकरांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरला.

अनुज म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ संबंध आणि दीर्घ संवाद होता. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगामध्ये असताना नेताजी सुभाषचंद्र बोस देखील तिथे शिक्षा भोगत होते. ब्रिटिश साम्राज्याला ज्या भारतीय नेत्यांपासून धोका होता, अशा नेत्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्याचा त्याकाळी प्रघात होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात मृत्यू झाला होता, हाच इतिहास भारताला माहिती आहे पण खरेच त्यांचा मृत्यू झाला होता का, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का, त्यांच्या जगण्यावरून किंवा मृत्यूवरून राजकारण करायचे होते का, अशा अनेक प्रश्नांची उकल यावेळी अनुज धर यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाद्वारे केली.

चंद्रचूड म्हणाले की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला का, नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहत होते का, नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, नेताजीनंतर कोणत्या नावाने वावरत होते आणि भारत सरकारने आतापर्यंत नेताजींसंदर्भात असलेल्या गोपनीय फाईल्स समोर का आणल्या नाहीत, या प्रश्नांची उत्तरे आमच्या संशोधनाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसPuneपुणे