शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Subhas Chandra Bose: सरकार दरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:10 IST

धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत....

पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राजकारणातील झंझावात होते. बोस यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतची कुजबुज आजही समाजात कानावर पडते. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतची संदिग्धता संपुष्टात आणून सरकार दरबारी त्यांच्या मृत्यूच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी, अशी मागणी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी केली.

अण्णाभाऊ साठे सभागृह येथे प्रथमेश गोसावी, आशुतोष नर्लेकर आणि संजय गोसावी यांनी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत.

यावेळी त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास पुणेकरांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरला.

अनुज म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ संबंध आणि दीर्घ संवाद होता. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगामध्ये असताना नेताजी सुभाषचंद्र बोस देखील तिथे शिक्षा भोगत होते. ब्रिटिश साम्राज्याला ज्या भारतीय नेत्यांपासून धोका होता, अशा नेत्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्याचा त्याकाळी प्रघात होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात मृत्यू झाला होता, हाच इतिहास भारताला माहिती आहे पण खरेच त्यांचा मृत्यू झाला होता का, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का, त्यांच्या जगण्यावरून किंवा मृत्यूवरून राजकारण करायचे होते का, अशा अनेक प्रश्नांची उकल यावेळी अनुज धर यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाद्वारे केली.

चंद्रचूड म्हणाले की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला का, नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहत होते का, नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, नेताजीनंतर कोणत्या नावाने वावरत होते आणि भारत सरकारने आतापर्यंत नेताजींसंदर्भात असलेल्या गोपनीय फाईल्स समोर का आणल्या नाहीत, या प्रश्नांची उत्तरे आमच्या संशोधनाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसPuneपुणे