शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय पुरंदरेंकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 05:42 IST

शरद पवार यांचे विधान : महाराजांच्या खऱ्या गुरू जिजाऊच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेकांनी लेखन केले आहे; मात्र त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरेंकडूनच झाला, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. तसेच महाराजांचे गुरू रामदास किंवा दादोजी कोंडदेव नव्हे, तर जिजाऊ माँ साहेबच आहेत, असेही ते म्हणाले.

इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी सकाळी पद्मावतीमधील अण्णा भाऊ साठे सभागृहात झाले. त्यावेळी पवार बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते. इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पवार यांनी शिवचरित्र लेखन व लेखकांचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की, वास्तव इतिहास काय आहे, त्याचे लेखन अभ्यासपूर्वक करणे आवश्यक आहे. शिवछत्रपतींचे गुरू राजमाता जिजाऊ याच होत्या. दादोजी कोंडदेवांना गुरुस्थानी बसविणे पूर्णत: अनैतिक आहे.

डॉ. कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना लेखनामागची भूमिका विशद केली. शिवरायांच्या इतिहासाने अनेक विचारप्रवाहांना प्रभावित केले आहे. त्यांच्याकडून त्यावर लेखन झाले आहे. ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

जेम्स ग्रँट डफ याने मराठ्यांच्या इतिहासाचे चार खंड लिहिले आहेत. मला त्यातील दोन खंड मिळाले. मी ते विकत आणले, वाचले. ते संपूर्णपणे निर्दोष होते, असे म्हणता येणार नाही. त्याचाच आधार घेत बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषणे केली, लेखन केले.     - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSharad Pawarशरद पवार