शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:36 IST

राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत

पुणे : राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत. शिवसेनेतून अनेक माणसे निघून चालली आहेत. पण आम्ही गेलेल्या लोकांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते एकत्र येतील आणि नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. 

 पुण्यात प्रभाग क्रमांक १० येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यचा वाटपचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वारंवार धक्के बसू लागले आहेत. आमदार यांच्या पाठोपाठ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखा अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश लागले आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे तेच आमचं चालले आहे. राजकारणाचा आवाका खूप मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद सुरु झाले आहेत. मी एक भगवत गीतेवर विश्वास ठेवणारी नास्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह सुरु होईल. मंत्रमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर, सरकारला शक्य होईल तेव्हा त्यांनी विस्तार करावा. 

सरकारने जनतेच्या बहुमताचा विचार करावा 

संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबाबत गोऱ्हे म्हणाल्या,  आता असं दिसतंय कि, कायदा नक्की तो काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणी घेतला तो जास्त काळ टिकत नाही. असे माझ्या अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे संभाजी नगर अथवा धाराशिव यांच्या नामांतराबाबत अल्पमत आणि बहुमताचा विचार करयाचा नसतो जनतेच्या बहुमताचा विचार करावा असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकEknath Shindeएकनाथ शिंदे