शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:36 IST

राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत

पुणे : राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत. शिवसेनेतून अनेक माणसे निघून चालली आहेत. पण आम्ही गेलेल्या लोकांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते एकत्र येतील आणि नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. 

 पुण्यात प्रभाग क्रमांक १० येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यचा वाटपचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वारंवार धक्के बसू लागले आहेत. आमदार यांच्या पाठोपाठ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखा अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश लागले आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे तेच आमचं चालले आहे. राजकारणाचा आवाका खूप मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद सुरु झाले आहेत. मी एक भगवत गीतेवर विश्वास ठेवणारी नास्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह सुरु होईल. मंत्रमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर, सरकारला शक्य होईल तेव्हा त्यांनी विस्तार करावा. 

सरकारने जनतेच्या बहुमताचा विचार करावा 

संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबाबत गोऱ्हे म्हणाल्या,  आता असं दिसतंय कि, कायदा नक्की तो काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणी घेतला तो जास्त काळ टिकत नाही. असे माझ्या अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे संभाजी नगर अथवा धाराशिव यांच्या नामांतराबाबत अल्पमत आणि बहुमताचा विचार करयाचा नसतो जनतेच्या बहुमताचा विचार करावा असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकEknath Shindeएकनाथ शिंदे