शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:36 IST

राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत

पुणे : राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत. शिवसेनेतून अनेक माणसे निघून चालली आहेत. पण आम्ही गेलेल्या लोकांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते एकत्र येतील आणि नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. 

 पुण्यात प्रभाग क्रमांक १० येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यचा वाटपचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वारंवार धक्के बसू लागले आहेत. आमदार यांच्या पाठोपाठ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखा अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश लागले आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे तेच आमचं चालले आहे. राजकारणाचा आवाका खूप मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद सुरु झाले आहेत. मी एक भगवत गीतेवर विश्वास ठेवणारी नास्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह सुरु होईल. मंत्रमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर, सरकारला शक्य होईल तेव्हा त्यांनी विस्तार करावा. 

सरकारने जनतेच्या बहुमताचा विचार करावा 

संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबाबत गोऱ्हे म्हणाल्या,  आता असं दिसतंय कि, कायदा नक्की तो काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणी घेतला तो जास्त काळ टिकत नाही. असे माझ्या अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे संभाजी नगर अथवा धाराशिव यांच्या नामांतराबाबत अल्पमत आणि बहुमताचा विचार करयाचा नसतो जनतेच्या बहुमताचा विचार करावा असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकEknath Shindeएकनाथ शिंदे