शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई योग्य

By नम्रता फडणीस | Updated: November 26, 2024 21:25 IST

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा आयोगासमोर अंतिम युक्तिवाद सुरु

पुणे : कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एकाजागी न होता शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली. मात्र, पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या त्याच्या नियमावली प्रमाणेच कारवाई केली आहे.

तसेच लाखो लोक असूनही पोलिसांनी कोणतीही जीवित हानी होऊ दिली नाही, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही पेरणेफाटा येथे भाविक पोलिसांमुळेच व्यवस्थित दर्शन घेऊ शकत होते. त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई योग्य होती अशा मुद्द्यांवर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर मंगळवारी ( दि.28) युक्तिवाद केला. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार उसळला होता.

या प्रकरणी राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त न्यायमूर्ती जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगापुढे ५३ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम युक्तिवाद दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार विशेष सरकारी वकील हिरे यांनी मंगळवारी (दि. २६) चौकशी आयोगासमोर अंतिम युक्तिवादाला सुरूवात केली.कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर त्याचे पडसाद अन्य ठिकाणी देखील उमटले. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव सह अन्य भागात ही जाळपोळ पसरली होती. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक त्यावेळी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले होते. मात्र, पोलीसांनी योग्य ती कारवाई करत जाळपोळ आटोक्यात आणली. लाखो लोक असूनही कोठेही चेंगरा-चेंगरीची घटना किंवा जीवित हानी होऊ दिली नाही. महिला, लहान मुलांना देखील सुखरूप सोडवले. आंदोलनावेळी अचानक हल्ला झाल्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेचा कोणताही परिणाम होऊ न देता पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, असा युक्तिवाद अॅड. हिरे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुरू राहणार आहे, असेही अॅड. हिरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक