शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

Maratha Reservation| ... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण

By श्रीकिशन काळे | Updated: October 19, 2023 20:33 IST

ज्ञानेश्वर मुळे यांना महर्षी पुरस्कार प्रदान ....

पुणे : आज आरक्षणाची लढाई सुरू आहे. रोज अल्टिमेट दिला जात आहे. गोंधळ चालला आहे. मूळ कारण काय आहे तर रोजगार मिळाला असता तर हे आंदोलन झालं नसतं. रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायला हवे होते. पण आज बेरोजगारी आहे. हाताला काम नसले की आंदोलन, चळवळ सुरू होते. त्यातून हिंसक वळण लागते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

पुणे नवरात्र महोत्सवामध्ये दरवर्षी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा ‘महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा भारतीय परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना प्रदान केला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र इंडस्ट्री विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते.

साळुंखे म्हणाले, राज्यात राजकारणाचे पुढे काय होणार याची चि़ंता लागली आहे. चांगले मजबूत सरकार असेल तर गुंतवणूक येऊ शकते. उद्योगजगताला स्थिरता येण्यासाठी राजकारण महत्वाचे आहे. उद्योगाची वाढ व्हायची असेल तर गुंतवणूक करणारे लोकं महाराष्ट्रात आले पाहिजेत. 

मुळे म्हणाले, अधिकारी झाला म्हणजे तो हवेत असतो. पण मला माझ्या आईवडिलांनी जे संस्कार दिले त्यातून मी घडलो. महाराष्ट्राने मला घडवलं. म्हणून मी आजही जमिनीवरच आहे. आज आपला शत्रू कोणता असेल तर ते जाती आहेत. जाती नष्ट करणारा कायदा आणायला हवा. सर्वजण आपण समान आहोत. खरंतर आज आपण जातीयवादी होत चाललो आहोत. ही शोकांतिका आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारताला प्रगत करायचे आहे, पण आज वास्तव वेगळे आहे. घोषणा देऊन होणार नाही. देशाला आज खूप कर्ज काढावं लागतं. भरमसाठ कर लावतात‌. या सरकारने ३० लाख कोटी मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी आहेत. ३० लाख कोटी गोळा केले तरी भागत नाही. म्हणून आता कंपन्या विकल्या जात आहेत. आता तर सैन्याला निवृत्ती वेतन द्यावे लागते म्हणून रेग्युलर आर्मी बंद केली. आता तात्पुरती भरती होणार आणि तीन वर्षं कामावर ठेवणार. त्यानंतर रस्त्यावर सोडून देणार. हे कशासाठी तर पेन्शनचा खर्च होऊ नये म्हणून एका बाजूला मोठ्या घोषणा होत आहेत‌, मोठी आर्थिक शक्ती आपण आहोत. पण नेमकं चाललंय काय हे आपण पाहत आहोत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास १८३ टक्के झाला आहे. पण आता देशाचा विकास केवळ ८३ टक्के झाला आहे. या नऊ वर्षांत आपल्या विकासाची गती कमी झाली आहे. म्हणून नोकरी नाहीत. मग दंगा करा, आंदोलन करा, असे सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण