शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Maratha Reservation| ... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण

By श्रीकिशन काळे | Updated: October 19, 2023 20:33 IST

ज्ञानेश्वर मुळे यांना महर्षी पुरस्कार प्रदान ....

पुणे : आज आरक्षणाची लढाई सुरू आहे. रोज अल्टिमेट दिला जात आहे. गोंधळ चालला आहे. मूळ कारण काय आहे तर रोजगार मिळाला असता तर हे आंदोलन झालं नसतं. रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायला हवे होते. पण आज बेरोजगारी आहे. हाताला काम नसले की आंदोलन, चळवळ सुरू होते. त्यातून हिंसक वळण लागते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

पुणे नवरात्र महोत्सवामध्ये दरवर्षी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा ‘महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा भारतीय परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना प्रदान केला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र इंडस्ट्री विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते.

साळुंखे म्हणाले, राज्यात राजकारणाचे पुढे काय होणार याची चि़ंता लागली आहे. चांगले मजबूत सरकार असेल तर गुंतवणूक येऊ शकते. उद्योगजगताला स्थिरता येण्यासाठी राजकारण महत्वाचे आहे. उद्योगाची वाढ व्हायची असेल तर गुंतवणूक करणारे लोकं महाराष्ट्रात आले पाहिजेत. 

मुळे म्हणाले, अधिकारी झाला म्हणजे तो हवेत असतो. पण मला माझ्या आईवडिलांनी जे संस्कार दिले त्यातून मी घडलो. महाराष्ट्राने मला घडवलं. म्हणून मी आजही जमिनीवरच आहे. आज आपला शत्रू कोणता असेल तर ते जाती आहेत. जाती नष्ट करणारा कायदा आणायला हवा. सर्वजण आपण समान आहोत. खरंतर आज आपण जातीयवादी होत चाललो आहोत. ही शोकांतिका आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारताला प्रगत करायचे आहे, पण आज वास्तव वेगळे आहे. घोषणा देऊन होणार नाही. देशाला आज खूप कर्ज काढावं लागतं. भरमसाठ कर लावतात‌. या सरकारने ३० लाख कोटी मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी आहेत. ३० लाख कोटी गोळा केले तरी भागत नाही. म्हणून आता कंपन्या विकल्या जात आहेत. आता तर सैन्याला निवृत्ती वेतन द्यावे लागते म्हणून रेग्युलर आर्मी बंद केली. आता तात्पुरती भरती होणार आणि तीन वर्षं कामावर ठेवणार. त्यानंतर रस्त्यावर सोडून देणार. हे कशासाठी तर पेन्शनचा खर्च होऊ नये म्हणून एका बाजूला मोठ्या घोषणा होत आहेत‌, मोठी आर्थिक शक्ती आपण आहोत. पण नेमकं चाललंय काय हे आपण पाहत आहोत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास १८३ टक्के झाला आहे. पण आता देशाचा विकास केवळ ८३ टक्के झाला आहे. या नऊ वर्षांत आपल्या विकासाची गती कमी झाली आहे. म्हणून नोकरी नाहीत. मग दंगा करा, आंदोलन करा, असे सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण