शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

आत्मविश्वासाने जा परीक्षेला

By admin | Updated: February 19, 2016 01:16 IST

सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण

पिंपरी : सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण चिंतातुर झाले आहे. यामुळे पालकांचीही धास्ती वाढली आहे. नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. बारावीची परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याइतपत काय घडले? या आत्महत्येमागील नेमके कारण समजून घेऊन परीक्षेच्या कालावधीत वातावरण आनंदी कसे राहील, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. यामुळे घरच्यांशी फार कमी संवाद होते. आपल्या मुलाला शिकण्यासाठी बाहेर ठेवले आहे, पालकांना ही अभिमानाची बाब वाटते. घरच्यांशी संभाषण झाले तरीही ते कमी प्रमाणात, तसेच अभ्यासाबद्दल होते. त्यातच वसतिगृहाची फी तसेच दैनंदिन खाण्याचा खर्च दिलेल्या पैशात होत नाही. शिक्षणासाठी परगावी राहिल्यानंतर पैशांचीही चणचण भासते. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे महाविद्यालयांनीही तितके सतर्क राहणे गरजेचे आहे. पाल्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले अथवा परीक्षेत नापास झाला, तर त्या पाल्याला घरच्यांची जास्त भीती वाटते, त्यातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. बारावीत शिकणारा हृषिकेश तापकीर याने घरातील अभ्यासखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ फेब्रुवारीला ही घटना घडली. मात्र, परीक्षेच्या कालावधीत आत्महत्या झाल्याने परीक्षेच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अजिंक्य डी. वाय पाटील कॉलेजमध्ये २० वर्षे वयाच्या प्रतीक पाटीलने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्र परीक्षेत सहापैकी पाच विषयांत तो नापास झाला होता. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा येणारा अतिरिक्त ताण, तसेच अभ्यासामुळे येणारा एकलकोंडेपणा आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंध, करिअरमधून नैराश्यामुळे असे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)