शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाने जा परीक्षेला

By admin | Updated: February 19, 2016 01:16 IST

सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण

पिंपरी : सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण चिंतातुर झाले आहे. यामुळे पालकांचीही धास्ती वाढली आहे. नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. बारावीची परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याइतपत काय घडले? या आत्महत्येमागील नेमके कारण समजून घेऊन परीक्षेच्या कालावधीत वातावरण आनंदी कसे राहील, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. यामुळे घरच्यांशी फार कमी संवाद होते. आपल्या मुलाला शिकण्यासाठी बाहेर ठेवले आहे, पालकांना ही अभिमानाची बाब वाटते. घरच्यांशी संभाषण झाले तरीही ते कमी प्रमाणात, तसेच अभ्यासाबद्दल होते. त्यातच वसतिगृहाची फी तसेच दैनंदिन खाण्याचा खर्च दिलेल्या पैशात होत नाही. शिक्षणासाठी परगावी राहिल्यानंतर पैशांचीही चणचण भासते. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे महाविद्यालयांनीही तितके सतर्क राहणे गरजेचे आहे. पाल्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले अथवा परीक्षेत नापास झाला, तर त्या पाल्याला घरच्यांची जास्त भीती वाटते, त्यातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. बारावीत शिकणारा हृषिकेश तापकीर याने घरातील अभ्यासखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ फेब्रुवारीला ही घटना घडली. मात्र, परीक्षेच्या कालावधीत आत्महत्या झाल्याने परीक्षेच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अजिंक्य डी. वाय पाटील कॉलेजमध्ये २० वर्षे वयाच्या प्रतीक पाटीलने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्र परीक्षेत सहापैकी पाच विषयांत तो नापास झाला होता. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा येणारा अतिरिक्त ताण, तसेच अभ्यासामुळे येणारा एकलकोंडेपणा आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंध, करिअरमधून नैराश्यामुळे असे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)