शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

आत्मविश्वासाने जा परीक्षेला

By admin | Updated: February 19, 2016 01:16 IST

सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण

पिंपरी : सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण चिंतातुर झाले आहे. यामुळे पालकांचीही धास्ती वाढली आहे. नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. बारावीची परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याइतपत काय घडले? या आत्महत्येमागील नेमके कारण समजून घेऊन परीक्षेच्या कालावधीत वातावरण आनंदी कसे राहील, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. यामुळे घरच्यांशी फार कमी संवाद होते. आपल्या मुलाला शिकण्यासाठी बाहेर ठेवले आहे, पालकांना ही अभिमानाची बाब वाटते. घरच्यांशी संभाषण झाले तरीही ते कमी प्रमाणात, तसेच अभ्यासाबद्दल होते. त्यातच वसतिगृहाची फी तसेच दैनंदिन खाण्याचा खर्च दिलेल्या पैशात होत नाही. शिक्षणासाठी परगावी राहिल्यानंतर पैशांचीही चणचण भासते. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे महाविद्यालयांनीही तितके सतर्क राहणे गरजेचे आहे. पाल्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले अथवा परीक्षेत नापास झाला, तर त्या पाल्याला घरच्यांची जास्त भीती वाटते, त्यातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. बारावीत शिकणारा हृषिकेश तापकीर याने घरातील अभ्यासखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ फेब्रुवारीला ही घटना घडली. मात्र, परीक्षेच्या कालावधीत आत्महत्या झाल्याने परीक्षेच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अजिंक्य डी. वाय पाटील कॉलेजमध्ये २० वर्षे वयाच्या प्रतीक पाटीलने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्र परीक्षेत सहापैकी पाच विषयांत तो नापास झाला होता. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा येणारा अतिरिक्त ताण, तसेच अभ्यासामुळे येणारा एकलकोंडेपणा आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंध, करिअरमधून नैराश्यामुळे असे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)