शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यांचा ताण

By admin | Updated: February 14, 2015 23:53 IST

शहरात केंद्र व राज्यातील मंत्री व व्हीआयपींच्या बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पोलिसांवर तसेच शासकीय यंत्रणेवर पडत आहे.

पुणे : शहरात केंद्र व राज्यातील मंत्री व व्हीआयपींच्या बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पोलिसांवर तसेच शासकीय यंत्रणेवर पडत आहे. १ नोव्हेंबर २०१४ ते १३ फेब्रुवारी २०१५ या १०५ दिवसांच्या कालावधीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री व व्हीआयपींचे १७० दौरे झाले आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक दौरे खासगी कार्यक्रमांसाठी झाल्याचे चित्र आहे.पुण्यात पुस्तक प्रकाशनापासून ते शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम, लग्न समारंभापर्यंतही राज्याचे तसेच केंद्राचे मंत्रिमहोदय सहभागी होताना दिसत आहेत. पुण्यातील कार्यक्रमांच्या रेलचेलीमध्ये मंत्रिगण, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सहभागी होणार म्हटले, की पोलीस, महसूल, राजशिष्टाचार विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडते. कार्यक्रमांच्या आयोजकांनी व्हीआयपींच्या सोयीनुसार कार्यक्रमाच्या तारखा ठरवलेल्या असतात. त्यानुसार या सर्व विभागांना दौऱ्याचे नियोजन करावे लागते. विमानतळावर स्वागताला हजर राहण्यापासून ते पुन्हा रवाना होईपर्यंत अधिकाऱ्यांना शिष्टाचार पाळावा लागतो. त्या दिवशी दिवसभर या व्हीआयपींच्या सेवेत तैनात राहावे लागते. पुण्यात राज्य मंत्रिमंडळातील तीन व केंद्रातील एक मंत्री आहेत. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जाताना पुणे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या दौऱ्यांचाही समावेश पुणे दौऱ्यातच होतो. मागील १०५ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी केंद्र व राज्यातील मंत्री यांचे १७० पेक्षा अधिक दौरे झाले आहेत. यासोबत राज्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, हायरिस्क कॅटेगिरीमधील व्यक्ती, संसदीय समित्यांचे सदस्यांचेही दौरे होत असतात. धार्मिक गुरू दलाई लामा यांचे तीन, संत गुरमीत यांचे दोन, पालघरचे पोलीस अधीक्षक यांचे तीन दौरे झाले आहेत. तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, गुजरात व उत्तर प्रदेशाचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरुण जेटली, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहमंत्रालयाचे सचिव अमिताभ राजन यांचेही दौरे झाले आहेत. (प्रतिनिधी)एका ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या बंदोबस्तासाठी १०० च्या आसपास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. जर एका व्यक्तीचे दिवसभरात तीन अथवा चार कार्यक्रम असतील तर चारही ठिकाणी वेगळा बंदोबस्त ठेवावा लागतो. हा बंदोबस्त ही अतिमहत्त्वाची व्यक्ती शहराबाहेर रवाना होईपर्यंत सोडण्यात येत नाही. विनाअडथळा प्रवासाकरिता विशेष वाहतूक पोलीस नेमावे लागतात. राज्यपाल सी. विद्यासागर राव०६मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस०९माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील१५सिक्कीम राज्यपाल श्रीनिवास पाटील१४केंद्रीय मंत्री नितीन गडकरी०६माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार०६माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे०५माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण०६माजी उपमुख्यमंत्री अजित पवार०७