शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

दहा कचरा प्रकल्पांना मान्यता

By admin | Published: May 06, 2015 6:18 AM

उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकणे बंद करण्याच्या ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दहा कचरा प्रकल्पांना मान्यतापुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकणे बंद करण्याच्या ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कसबा आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३ ते ५ टन क्षमतेच्या दहा प्रकल्पांची उभारणी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रकल्पांची उभारणी आणि पाच वर्षे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार असून, तो जास्त वाटत असल्याने याला विरोध झाला होता. कचराप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आणखी ९ महिने कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. या कालावधीमध्ये शहरात दररोज निर्माण होणाऱ्या तेराशे ते चौदाशे टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागातला कचरा प्रभागातच जिरविण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कसबा व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ३ ते ५ टनाचे १० कचरा प्रकल्प उभारण्याचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले. या प्रकल्पाच्या उभारणी व ५ वर्षांच्या व्यवस्थापनासाठी १५ कोटी रुपये महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत.प्रकल्पाची ५ वर्षे देखभाल, दुरुस्ती व दैनंदिन व्यवस्थापन ठेकेदाराकडे असणार आहे, प्रकल्पाच्या विजेचा खर्च मात्र महापालिकेला करावा लागणार आहे. मात्र, विजेचा खर्च करूनही प्रकल्पाचा व्यवस्थापकीय खर्च महापालिकेला अधिक द्यावा लागणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविल्याने, हा मागील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुढे ढकलण्यात आला होता.स्थायी समितीतील विरोधाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुन्हा एकदा ठेकेदाराशी पत्रव्यवहार करून प्रकल्पाचा खर्च कमी करण्याची विनंती केली. प्रकल्पांची निविदा २३ टक्के कमी दराने भरली, तसेच यापूर्वी तडजोडीने ४५ लाख रुपये कमी केले असल्याने त्यामध्ये आणखी कपात करू शकत नसल्याचे ठेकेदाराने महापालिकेला कळविले. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कुणाल कुमार यांनी वस्तुस्थिती निर्दशनास आणून दिली. त्यानंतर या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)'