शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तंत्रज्ञानाचा गैरवापर अधिक : मोहन आगाशे; पुणे साहित्यिक कलावंत संमेलनात रंगली मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:20 IST

१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते. 

ठळक मुद्दे१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगला मुलाखतीचा कार्यक्रममुलांना चांगली शिकवण आणि संस्कार मिळणे गरजेचे : मोहन आगाशे

पुणे : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे संबोधले जाते. या डिजिटलायझेशनच्या युगात मोबाईलचा अतिवापर होत आहे. यामुळे संवाद, भाषा, संपर्क या गोष्टी कमी होताना दिसून येत आहेत. अशा वेळी समाजात तंत्रज्ञानाचा चांगला वापर होण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचा गैरवापर होत आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते. आगाशे म्हणाले, तरुण पिढीचे आयुष्य हे जलद होत चालले आहे. या तंत्रज्ञानामुळे मुले पुढे जात आहेत. त्यांनी मोबाईलचे व्याकरण शिकले पाहिजे. मोबाईलवर फोटो काढून त्याच्या आहारी जाण्यापेक्षा त्या फोटोचा वापर करून त्यापासून चित्रपट निर्माण होऊ शकतो, याचा विचार करायला पाहिजे. पूर्वी चित्रपट निर्मितीसाठी कॅमेऱ्याची गरज होती; पण आता कॅमेरा तुमच्या हातात आहे, त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. तसेच या काळात भाषेला महत्त्व देणे ही एक मोठी बाब आहे. डिजिटलमुळे साक्षरता वाढत गेली व जग दोन गोष्टींत वाटले गेले. काहींना डिजिटल भाषा कळत होती तर काही लोक यापासून वंचित राहिले. आता या युगात डिजिटल भाषा शिकणे हे खूपच महत्त्वाचे आहे. तरुण पिढी यामध्ये पुढे असून ज्येष्ठ लोक मात्र मागे आहेत. समाज सिनेमा बघायला जाताना तो कुठल्या हेतूने बघतो हे जाणून घेतले पाहिजे. सिनेमा बघताना त्याची निराळी भाषा असते ती आपली ज्ञानेंद्रिये आत्मसात करत असतात. कलेचा हा वेगळाच अनुभव सर्वांनी घ्यावा आणि भाषा हे माध्यम समजून घ्यावे.

मुलांकडून आत्महत्या तरुण मुलांसाठी भारतात पंधरा ते तीस वयोगटातील मुले आत्महत्या करत आहेत. आणि त्याचे सर्वांत जास्त प्रमाण भारत या देशात आहे. तर मुलांना चांगली शिकवण आणि संस्कार मिळणे गरजेचे आहे व सतत निर्माण झालेला तणाव यातूनही बाहेर काढले पाहिजे, असे मोहन आगाशे म्हणाले. 

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे