शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

तंत्रज्ञानामुळे आयुष्य समृद्ध : विवेक सावंत;  पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:04 IST

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. 

ठळक मुद्देज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावर दोन दिवसीय परिसंवादस्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे : विद्या बाळ

पुणे : ‘आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होत आहे. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ, मानसशास्त्रज्ञ मानस मंडल, आयुक्त श्रावण हर्डिकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कुकडे, विद्या बाळ यांनी विचार मांडले. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी केले.या वेळी एकतर्फी तलाकविरुद्ध दीर्घ लढाई दिलेले सय्यदभाई, भटक्या गोपाळ समाजासाठी कार्यरत असणारे नरसिंग झरे, प्रशासकीय अधिकारी शीतल तेली-उगले आणि सेरेब्रल पाल्सी विषयात दीर्घकाळ काम करणाऱ्या दीपा पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘वेगाने बदलणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीत स्वत:च्या आणि इतरांच्या जीवन गुणवत्तेबाबत विचार करणे अनिवार्य झाले आहे. भारतभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिषदेच्या माध्यमातून आपले संशोधन निबंध वाचले. येत्या काळाची गरज म्हणून या विषयातील मूलभूत संशोधन प्रकल्प हाती घेण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्य संयोजिका अनघा लवळेकर यांनी केले. सुचरिता गद्रे, सुजल वाटवे, प्रणिता जगताप यांनी या परिषदेचे संयोजक समिती सदस्य म्हणून काम पाहिले.        ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट म्हणाले की, ‘जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यक्तीने तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे प्रवास करण्याचा संदेश भारतीय तत्त्वज्ञान सांगते. जीवनव्रती समाजातील अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांची जीवन गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत असतात.’   विद्या बाळ म्हणाल्या की, ‘जीवन गुणवत्ता बाहेरून मिळवता येत नाही, ती मनाच्या आतून मिळवावी लागते. स्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे असून, त्याशिवाय त्यांच्या जीवन गुणवत्तेबद्दल बोलणे शक्य होणार नाही.’

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे