शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानामुळे आयुष्य समृद्ध : विवेक सावंत;  पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:04 IST

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. 

ठळक मुद्देज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावर दोन दिवसीय परिसंवादस्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे : विद्या बाळ

पुणे : ‘आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होत आहे. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ, मानसशास्त्रज्ञ मानस मंडल, आयुक्त श्रावण हर्डिकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कुकडे, विद्या बाळ यांनी विचार मांडले. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी केले.या वेळी एकतर्फी तलाकविरुद्ध दीर्घ लढाई दिलेले सय्यदभाई, भटक्या गोपाळ समाजासाठी कार्यरत असणारे नरसिंग झरे, प्रशासकीय अधिकारी शीतल तेली-उगले आणि सेरेब्रल पाल्सी विषयात दीर्घकाळ काम करणाऱ्या दीपा पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘वेगाने बदलणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीत स्वत:च्या आणि इतरांच्या जीवन गुणवत्तेबाबत विचार करणे अनिवार्य झाले आहे. भारतभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिषदेच्या माध्यमातून आपले संशोधन निबंध वाचले. येत्या काळाची गरज म्हणून या विषयातील मूलभूत संशोधन प्रकल्प हाती घेण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्य संयोजिका अनघा लवळेकर यांनी केले. सुचरिता गद्रे, सुजल वाटवे, प्रणिता जगताप यांनी या परिषदेचे संयोजक समिती सदस्य म्हणून काम पाहिले.        ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट म्हणाले की, ‘जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यक्तीने तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे प्रवास करण्याचा संदेश भारतीय तत्त्वज्ञान सांगते. जीवनव्रती समाजातील अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांची जीवन गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत असतात.’   विद्या बाळ म्हणाल्या की, ‘जीवन गुणवत्ता बाहेरून मिळवता येत नाही, ती मनाच्या आतून मिळवावी लागते. स्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे असून, त्याशिवाय त्यांच्या जीवन गुणवत्तेबद्दल बोलणे शक्य होणार नाही.’

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे