शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:35 IST

दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.

राजेगाव - दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असून, सर्वत्र शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल. त्यांची पावलं आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. पदयात्रा काढून नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत येण्यासाठी सांगितले गेले.शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांसाठी गावातील प्रमुख पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, क्रीडा मंडळे, तरुण मंडळे, महिला बचत गटाच्या सदस्य व विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकाºयांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेत गोड पदार्थाचा समावेश करून विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचा आस्वाद दिला जाणार आहे.स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांच्या शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे व सर्व शिक्षकांनी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी (दि. १४) रोजी गावातून पदयात्रा काढून नव्याने प्रवेशित होणाºया बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत दाखल होण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गुणात्मक वाटचालीची अपेक्षादि. १५ रोजी शाळेला सुरुवात होत आहे. हा शुभारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना सर्व शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.- गोरक्षनाथ हिंगणे, गटशिक्षणाधिकारीदीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल आणि त्याची पावले आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. यासाठी आनंदी वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना सूचित करण्यात आले आहे.- नंदा धावडे, केंद्रप्रमुख राजेगाव

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक