शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:35 IST

दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.

राजेगाव - दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असून, सर्वत्र शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल. त्यांची पावलं आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. पदयात्रा काढून नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत येण्यासाठी सांगितले गेले.शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांसाठी गावातील प्रमुख पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, क्रीडा मंडळे, तरुण मंडळे, महिला बचत गटाच्या सदस्य व विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकाºयांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेत गोड पदार्थाचा समावेश करून विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचा आस्वाद दिला जाणार आहे.स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांच्या शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे व सर्व शिक्षकांनी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी (दि. १४) रोजी गावातून पदयात्रा काढून नव्याने प्रवेशित होणाºया बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत दाखल होण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गुणात्मक वाटचालीची अपेक्षादि. १५ रोजी शाळेला सुरुवात होत आहे. हा शुभारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना सर्व शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.- गोरक्षनाथ हिंगणे, गटशिक्षणाधिकारीदीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल आणि त्याची पावले आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. यासाठी आनंदी वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना सूचित करण्यात आले आहे.- नंदा धावडे, केंद्रप्रमुख राजेगाव

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक