शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

मराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी शिष्टमंडळाची त्वरीत कार्यवाही व्हावी, महामंडळाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:11 IST

मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.

ठळक मुद्देएक उच्चाधिकार समिती विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावीप्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश

पुणे : बडोदे येथे संमेलन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या डोंबिवली येथील संमेलनात ठराव संमत केला. या ठरावानुसार महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे नेण्याची जी मागणी मान्य केली त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवीत हे शासन त्याबाबत सकारात्मक आहे असे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याबाबतही आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरीत अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी, अशीही विनंती डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या, सूचना संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जी  थेट भेट महामंडळाने अनेक वर्षांपासून मागितली व जो पाठपुरावा महामंडळाने दोन वर्षांपासून चालवला आहे त्यालाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होईल असे जे जाहीर केले त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशीरात उशीरा ३० मार्च पूर्वी आयोजित करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंतीही या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.या प्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास असून तो ते सार्थ ठरवतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे