शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी शिष्टमंडळाची त्वरीत कार्यवाही व्हावी, महामंडळाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:11 IST

मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.

ठळक मुद्देएक उच्चाधिकार समिती विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावीप्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश

पुणे : बडोदे येथे संमेलन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या डोंबिवली येथील संमेलनात ठराव संमत केला. या ठरावानुसार महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे नेण्याची जी मागणी मान्य केली त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवीत हे शासन त्याबाबत सकारात्मक आहे असे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याबाबतही आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरीत अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी, अशीही विनंती डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या, सूचना संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जी  थेट भेट महामंडळाने अनेक वर्षांपासून मागितली व जो पाठपुरावा महामंडळाने दोन वर्षांपासून चालवला आहे त्यालाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होईल असे जे जाहीर केले त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशीरात उशीरा ३० मार्च पूर्वी आयोजित करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंतीही या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.या प्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास असून तो ते सार्थ ठरवतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे