शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मराठीच्या अभिजाततेचा निर्णय तातडीने व्हावा; महामंडळ अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:34 IST

बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 

ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली विनंती वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही मांडली पत्रात

पुणे : बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. बडोद्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व मराठी खासदार, आमदार, केंद्रातील मराठी मंत्री यांनी एकत्रितपणे पंतप्रधानांना विनंती करुन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्याची गळ घालावी, त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: वेळ काढून तातडीचे प्रयत्न करावेत, केवळ राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा बडोदा संमेलनापूर्वी करावी, जेणेकरुन संमेलनात अभिनंदनाचा ठराव करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मराठीच्या अभिजात दर्जासाठी पत्रे, निवेदने, मागण्या, ठराव, वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही जोशी यांनी पत्रात मांडली आहे.९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केंद्राकडून मराठीला अभिजात दर्जाची घोषणा आणि राज्याकडून मराठी विद्यापीठ स्थापनेची घोषणा या पार्श्वभूमीवरच होईल, असे प्रयत्न करत मुख्यमंत्र्यांनी तडक कृती करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यासाठी केलेल्या ठरावांचा सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे स्मरण मुख्यमंत्र्यांना करुन देत, मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची आणि दिल्लीत जंतरमंतरवर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वाला हे गा-हाणे मांडण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची विनंती ९० व्या साहित्य संमेलनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. त्याचेही स्मरण डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे करुन दिले आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस