शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

जलसंपदा अधिका-यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

पुणे : पालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करुन तीन वर्षांपुर्वी मुंढवा जॅकवेल प्रकल्प कार्यान्वित ...

पुणे : पालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करुन तीन वर्षांपुर्वी मुंढवा जॅकवेल प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले ५५० टीएमसी सांडपाणी दौंडपर्यंत बेबी कॅनॉलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार होती. ही जबाबदारी जलसंपदा विभागाची होती. परंतु, जलसंपदाकडून १०-१५ टक्के पाणीसुध्दा शेतीसाठी सोडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जलसंपदाच्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

एकीकडे पुणेकरांना जास्तीचे १०० एमएलडी पाणी देताना अडचणी उभ्या करणारा जलसंपदा विभाग शेतक-यांनाही त्यांच्या हक्काचे पाणी देत नसल्याचे चित्र संतापजनक आहे. कालवा समितीच्या बैठकीत याच जलसंपदा विभागाचे अधिकारी शेतीसाठी धरणातून आवर्तन देण्याच्या नावाखाली पुण्याला पाणी वाढवून देण्यास विरोध करतात. एकीकडे शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध असणारे प्रक्रिया केलेले सांडपाणी जलसंपदा विभाग शेतक-यांना मिळू देत नाही आणि त्याच शेतक-यांना धरणातून स्वच्छ पाण्याचं आवर्तन देण्यासाठी जलसंपदा विभाग आग्रह धरतोय यामागचे गौडबंगाल काय आहे, हे समजत नसल्याचे सजग अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालकमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

जलसंपदाच्या या कृतीमधून फक्त पुणेकरांना जास्तीचं पाणी वाढवून द्यायचं नाही हीच कोती मनोवृत्ती दिसत असून पुणेकरांच्या करातून उभारलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून शेतक-यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळू न देणा-या अधिका-यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली.