शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विराट हिंदू संमेलनातून स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 22:56 IST

वारकरी संप्रदायाने देहूत येण्यापासून त्यांना रोखले.

पिंपरी : संत तुकाराम महाराज गाथेबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांना बुधवारी देहू येथे होणाऱ्या विराट हिंदू संमेलनातून माघार घ्यावी लागली. वारकरी संप्रदायाने देहूत येण्यापासून त्यांना रोखले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ येथील राष्ट्रीय चर्चासत्रात स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी बीजभाषण केले. या बीजभाषणात संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा हे संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत, असे भाष्य केले. त्यावर जोरदार टीका होत आहे.

देहूगाव येथे बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत गाथा मंदिराच्या मैदानावर विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात स्वामी गोविंददेवगिरी महाराज, हभप बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर, पांडुरंगमहाराज घुले आदी उपस्थित राहणार होते. ही माहिती वारकऱ्यांना आणि देहू देवस्थानच्या विश्वस्तांना मिळाली. त्यानंतर दुपारी बैठक झाली. त्यात त्यांनी गोविंददेवगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी विराट हिंदू संमेलनाच्या संयोजकांशी संवाद साधला व भूमिका समजावून सांगितली. वारकरी तीव्र नाराज आहेत. अशा परिस्थतीत गोविंददेवगिरी महाराजांनी देहूत येऊ नये, अशी वारकऱ्यांची भूमिका सांगितली. दरम्यान, काही वारकरी कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महाराज आले नाहीत.

नितीन महाराज मोरे म्हणाले की, स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या भूमिकेबद्दल वारकरी संप्रदायात नाराजी आहे. त्यात देहू येथे होणाऱ्या विराट हिंदू संमेलनात त्यांना आज बोलावले होते. यातून त्यांना शुद्धिपत्र देण्याचा प्रयत्न होत असल्याची संप्रदायात भावना निर्माण झाली. त्यामुळे गाथेला दुय्यम स्थान देणारी व्यक्ती बीज सोहळ्यात आली तर गोंधळ होऊ शकतो, अशी भूमिका बंडातात्या कराडकर आणि संयोजकांना सांगितली. त्यामुळे स्वामी गोविंददेवगिरी महाराज देहूत आले नव्हते.

संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार म्हणाले की, समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार करणे स्वागतार्ह असले तरी त्यासाठी इतर संतांच्या वाङ्मयीन योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील संत परंपरा विविध विचारधारांचा संगम आहे. कोणत्याही एका प्रवाहाला उंचावण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणे ही परंपरेच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारी बाब आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Govinddev Giri Withdraws from Virat Hindu Sammelan Amid Controversy

Web Summary : Swami Govinddev Giri faced opposition for remarks on Sant Tukaram's Gatha. Warakaris protested, preventing his attendance at Dehu's Virat Hindu Sammelan. His comments sparked controversy, leading to his withdrawal from the event.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड