शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

समान पाणी योजनेचे सर्वेक्षण अखेर सुरू; जलवाहिन्या बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:41 IST

बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे.

पुणे : बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. नागरिकांनी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ते विचारतील ती माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.गेल्या सलग दीड-दोन वर्षांपासून समान पाणी योजनेची चर्चा शहरात सुरू आहे. या एका योजनेसाठी महापालिकेने तब्बल २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले आहेत. त्याचे दरमहा व्याज महापालिकेला जमा करावे लागत आहे. त्याचे त्यानंतर योजनेच्या निविदांवरून वाद झाले. फेरनिविदा काढली तर त्यातही अनेक आरोप झाले. आता निविदा मंजूर झाल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे आधीच टीकेचे लक्ष्य झालेल्या या योजनेकडे आता साशंकतने पाहिले जाऊ लागले आहे. महापालिकेच्या वतीने कंपन्यांचे सर्व्हेअर आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांना सर्वेक्षण करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे सही-शिक्क्यासह ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना ते विचारतील ती सर्व माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. हे काम किमान पावसाळा पूर्ण होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. शहराचा आराखडा तयार करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आता दिसते आहे.- या योजनेत शहरातील सर्व जुन्या पाईपलाईन बदलण्यात येतील. सुमारे १ हजार ८०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्यामुळे आता ते काम करण्यात येईल. शहरातील प्रत्येक घरात जाऊन खासगी कंपनीचे कर्मचारी नळजोडधारकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, मिळकतकर क्रमांक, कुटुंबातील सदस्य संख्या, मिळकतीचा प्रकार, जीपीएस अक्षांश-रेखांश अशा स्वरूपाच्या नोंदी हे कर्मचारी करणार आहेत. त्यासाठी ते नागरिकांकडे विचारणा करतील.

टॅग्स :Waterपाणी