शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे झाले मोठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:47 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुणे : ‘परंपरेमध्येच अभिजातता मिळते. परंपरेला मानवणारी नवता असली पाहिजे. परंपरा घाबरली तर नवतेला अर्थ राहत नाही. शास्त्राला लवचिक करणारे प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. आविष्कार हा तंत्र, विद्या, बुद्धी की मनातून होतोय हे कळले पाहिजे. बंदिश आणि रचना यातील फरक समजला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. ‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे मोठे झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘‘संगीत कुठे आणि आपण कुठे आहोत, असा प्रश्न पडण्याचा सध्याचा काळ आहे. संगीतात आता केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस उरले आहेत. स्वत:ला आचार्य म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत. संगीत ही योगक्रिया आहे. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या चार स्तरांवर संगीत विकसित होते. मात्र, आता शिकण्या-शिकवण्याची गंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे,’’ अशी खंत पं. तळवलकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. त्यावेळी तळवलकर यांनी गुरु-शिष्य परंपरा, साधनेचे महत्व, संगीताची जादू अशा विविध मुद्दयांवर भाष्य केले. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी यावेळी उपस्थित होते.

बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तळवलकर म्हणाले, ‘संगीतामध्ये साहित्य, तंत्र, सादरीकरण हे घराण्यांचे निकष असतात. प्रत्येक घराणे वेगळे विचार देते. गुरू केवळ संगीत शिकवत नाही, तर तो विचार देतो. संगीतातून मिळणारी उर्जा हा गुरूकडून मिळालेला प्रसाद असतो. दोन बंदिशी कमी गायला मिळाल्या तरी चालतील, संगीतातून मिळणारा आनंद महत्वाचा आणि तोच पुढील पिढीला वारसा म्हणून देता येतो. संगीतात विधानाची पूर्तता म्हणजे समेवर येण्याचा क्षण असतो. धुनीच्या माध्यमातून कलाकार विधानापर्यंत पोचतो तेव्हा बंदिश जन्म घेते. बंदिश हे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप असते. अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूप घेते, तेव्हा कलाकार पुढील अमूर्ताचा शोध घेतो. 

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेSuresh Talwalkarपं. सुरेश तळवलकरmusicसंगीतcultureसांस्कृतिक