शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे झाले मोठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:47 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुणे : ‘परंपरेमध्येच अभिजातता मिळते. परंपरेला मानवणारी नवता असली पाहिजे. परंपरा घाबरली तर नवतेला अर्थ राहत नाही. शास्त्राला लवचिक करणारे प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. आविष्कार हा तंत्र, विद्या, बुद्धी की मनातून होतोय हे कळले पाहिजे. बंदिश आणि रचना यातील फरक समजला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. ‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे मोठे झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘‘संगीत कुठे आणि आपण कुठे आहोत, असा प्रश्न पडण्याचा सध्याचा काळ आहे. संगीतात आता केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस उरले आहेत. स्वत:ला आचार्य म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत. संगीत ही योगक्रिया आहे. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या चार स्तरांवर संगीत विकसित होते. मात्र, आता शिकण्या-शिकवण्याची गंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे,’’ अशी खंत पं. तळवलकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. त्यावेळी तळवलकर यांनी गुरु-शिष्य परंपरा, साधनेचे महत्व, संगीताची जादू अशा विविध मुद्दयांवर भाष्य केले. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी यावेळी उपस्थित होते.

बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तळवलकर म्हणाले, ‘संगीतामध्ये साहित्य, तंत्र, सादरीकरण हे घराण्यांचे निकष असतात. प्रत्येक घराणे वेगळे विचार देते. गुरू केवळ संगीत शिकवत नाही, तर तो विचार देतो. संगीतातून मिळणारी उर्जा हा गुरूकडून मिळालेला प्रसाद असतो. दोन बंदिशी कमी गायला मिळाल्या तरी चालतील, संगीतातून मिळणारा आनंद महत्वाचा आणि तोच पुढील पिढीला वारसा म्हणून देता येतो. संगीतात विधानाची पूर्तता म्हणजे समेवर येण्याचा क्षण असतो. धुनीच्या माध्यमातून कलाकार विधानापर्यंत पोचतो तेव्हा बंदिश जन्म घेते. बंदिश हे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप असते. अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूप घेते, तेव्हा कलाकार पुढील अमूर्ताचा शोध घेतो. 

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेSuresh Talwalkarपं. सुरेश तळवलकरmusicसंगीतcultureसांस्कृतिक