शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

स्वातंत्र्यलढ्याबाबत सुमित्रा महाजन अज्ञानी, काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:58 IST

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ज्या पक्षाच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्यामुळेच चले जाव चळवळीसंदर्भात त्या अज्ञानी आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.

पुणे - लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ज्या पक्षाच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्यामुळेच चले जाव चळवळीसंदर्भात त्या अज्ञानी आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी देशाला स्वातंत्र्य चले जाव चळवळीमुळे मिळाले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका करण्यात येत आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्याचा समाचार घेतला. महाजन यांनी अज्ञानातून तसे वक्तव्य केले. सन १८५७ मध्ये सुरू झालेला स्वातंत्र्यलढा सन १९४७ मध्ये संपला. सन १९४२ ची महात्मा गांधी यांनी सुरू केलेली चले जाव चळवळ हे त्यातले सुवर्णपान आहे. महाजन यांच्या भाजपाची मातृसंघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगळता संपूर्ण देश या चळवळीत सहभागी झाला होता व त्याला घाबरूनच इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. इतिहास असा असताना आता महाजन चले जाव चळवळीला कमी लेखत आहे, हे त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासंबधी असलेल्या अज्ञानाचेच द्योतक आहे, अशी टीका बागवे यांनी केली. महात्मा गांधी यांनी सुरू केलेली ही चळवळ भारतालाच नाही तर पारतंत्र्यात असलेल्या जगातील अनेक देशांना प्रेरणादायी ठरली. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग ही त्याचीच उदाहरणे आहेत. महाजन यांनी हे सर्व माहीत करून घ्यावे व नंतरच स्वातंत्रलढ्याबाबत बोलावे, पुण्यात बोललात तसे आता अन्य ठिकाणी तरी बोलू नये, असे आवाहन केले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनcongressकाँग्रेस