शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसउत्पादक ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये

By admin | Updated: December 7, 2015 00:19 IST

सोलापूर व नगर जिल्ह्यांतील कारखान्यांपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने १५०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.

सोमेश्वरनगर : सोलापूर व नगर जिल्ह्यांतील कारखान्यांपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने १५०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. पहिल्या उचलीची कोंडी फोडली आहे. पण इतर कारखाने याचे अनुकरणच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मात्र कारखानदारांपाठोपाठ आता ऊसउत्पादक शेतकरीही ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेला आहे. पूर्वीच्या ८५ टक्के साखरेच्या पोत्याच्या मूल्यांकनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्विंटलला ९० टक्के उचल देण्याचे जाहीर केले होते. आता ९० टक्के उचलीमुळे १३९६ रुपये ऊसउत्पादकांना देण्यासाठी राहणार आहेत. मात्र, चालू वर्षी साखर कारखाने शेतकऱ्याच्या हातात फक्त टनाला १५०० रुपयेच टेकवून शेतकऱ्यांची बोळवण करत आहेत.एक एकर ऊसशेतीचा खर्च पाहता आता कारखान्यापाठोपाठ ऊस उत्पादक शेतकरीही शॉर्टमार्जिनमध्ये गेला आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. मात्र, कारखान्यांनी अजून एफआरपी जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे राज्य बँकेने शेतकऱ्यांना देण्यासाठी अवघे १२७७ रुपये कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे आता कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा विचार न करता टनाला १५०० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे २२०० ते २३०० रुपये पहिल्या हप्त्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या आशेवर पाणी पडले. शेतकऱ्यांचा ऊसशेतीचा एकरी खर्च ९६ हजारांवर गेला आहे. सध्या आडसाली उसाला ५० टनाची सरासरी मिळत आहे. खोडवा ऊस चालू होताच ही सरासरी ३५ ते ३८ टनांवर खाली येणार आहे. सध्याच्या एकरी ५० टनाच्या सरासरीने हिशेब केल्यास १५०० हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. ९६ हजार एकरी खर्चातून मिळणारी रक्कम वजा केली असता ऊसउत्पादक शेतकरी एक एकरामागे २१ हजार रुपयांना शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)पाचटाशिवाय हातात काहीच उरत नाही ...गेल्या तीन वर्षांपासून ऊसशेती परवडेना झाली आहे. उसाला केलेला खर्च पाहता, पाचटाशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहात नाही. सरकारने दरवर्षी कर्जाचे पॅकेज देण्यापेक्षा साखरेचे दर कसे वाढतील हे पाहावे, असे ऊस उत्पादक शेतकरी मिलिंद वायाळ यांनी सांगितले....अजित पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व करावेज्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाने एफआरपीच्या एकरकमी मागणीसाठी माळेगाव कारखान्यावर मोर्चा काढला होता, त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर राष्ट्रवादी पक्षाने मोर्चे काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. त्या मोर्चाचे नेतृत्व अजित पवार यांनी करावे, असे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सांगितले.शेतकरी संघटना न्यायालयात जाणार...एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे तसा कायद्याच आहे. १५०० रुपये जर पहिली उचल दिल्यास शेतकरी संघटना न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. सरकारने २५ किमी साखर कारखान्यांमधील अंतराची अट शिथील करावी. त्यामुळे नवीन कारखाने होतील. ज्यांना परवडेल ते दर देतील, न परवडणारे कारखाने बंद ठेवतील, असे माजी अध्यक्ष साखर संघ पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.