शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

साखर उता-यात सोमेश्वर कारखान्याने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:22 IST

साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात बाजी मारली आहे.

सोमेश्वरनगर - साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात बाजी मारली आहे.गेल्या वर्षी, याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते, तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग रात्रंदिवस धडपडत आहे.राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत. त्यामुळे ऊस तुटून गेल्यानंतर गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत.दरम्यान, कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हाताशी धरून मिटिंगवर मिटिंग घेत असून, रोजची रणनीती आखत आहे. कारखाना सध्या सभासदांचा ऊस मागे ठेवत आहे. बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्याचे लक्ष लागले आहे. उसाचे अपुरे क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव, याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते.अनेक साखर कारखान्यांचे आडसाली उसाचेच गाळप सुरू असून, सभासदांचे ऊस अद्यापही शेतातच उभे आहेत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. आडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडेल, त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना एप्रिल महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.चालू हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने उसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहेत. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.सर्व कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने ४ लाख ७० हजार ९१० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ९४ हजार ५० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दौंड शुगर कारखान्याने ३ लाख ८३ हजार ४२५ मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख १९ हजार १५० पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला. तर ३ लाख ५९ हजार २६० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख १ हजार २०० पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर तिसºया क्रमांकावर आहे.साखर उतारा :सोमेश्वर कारखाना : ११.२४भीमाशंकर कारखाना : ११.१२विघ्नहर कारखाना : ११.०६

टॅग्स :Puneपुणे