शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 02:47 IST

सहकारी संस्थांना थकबाकीच्या ३० टक्के कमावण्याची संधी.

विशाल शिर्के पिंपरी :  कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतींसह सहकारी साखर कारखाना, सहकारी सूत गिरणी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महिला बचत गटांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यापोटी प्रति बिल पाच रुपये ते थकबाकीच्या ३० टक्के रक्कम मिळविण्याची संधी या संस्थांना मिळणार आहे.कृषी आणि इतर वीज बिल थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बिल वसुलीसाठी ग्रामपंचायतींना नेमण्याचे पाऊल महावितरणने उचलले. त्या पुढे जात महिला बचत गट आणि सहकारी संस्थांनादेखील बिल वसुलीचे अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींना कृषी आणि इतर सर्व प्रकारच्या वीज बिल वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. उर्वरित संस्थांना केवळ कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार असतील. या संस्थांना प्रति पावतीमागे पाच रुपये दिले जातील. 

अशी होईल संस्थांची नोंदणी -- महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वेब पोर्टलद्वारे नोंदणी होणार.- संस्थांना संगणकीय प्रणालीद्वारे कलेक्शन सेंटर कोड मिळणार.- ग्रामपंचायत वगळता इतर संस्थांना बिल भरणा केंद्र मंजुरीनंतर महापॉवर पे या वॉलेटद्वारे कृषी ग्राहकांचा बिल भरणा करता येईल.- सरपंच, ग्रामसेवक, संचालक यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड या माध्यमातून ग्रामपंचायत नोंदणीकृत होणार.- सरासरी वीज बिल भरण्याच्या तीन दिवसाइतकी रक्कम अनामत म्हणून घेणार, अनामत रक्कम दरमहा सुधारित केली जाणार.

इतका मिळेल मोबदला  -- प्रति वीज बिल पावतीमागे ५ रुपये.- शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकी रकमेवर १० टक्के प्रोत्साहन रक्कम.- उर्वरित संस्थांनी कृषी थकबाकी स्वीकारल्यास भरणा केलेल्या रकमेच्या ३० टक्के आणि चालू कृषी वीज बिलाचा भरणा केल्यास २० टक्के प्रोत्साहन मोबदला मिळेल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजgram panchayatग्राम पंचायत