शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 10:24 IST

निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

पुणे: 2 वर्षांचा कोरोना महामारीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे शेकडो ऊसतोड कामगार टोळ्यांचे तालुक्‍यात आगमन होत आहे. परिसरात ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड कामगार यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

एका टोळीत दहा ते बारा कुटुंब व पंचवीस ते तीस मजुरांची संख्या आहे ऊस कामगार  टोळ्या दाखल झाल्याने नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक परिसराला साखर कारखानदारीचे स्वरूप आल्याचे जाणवत  आहे. सदरच्या कामगार टोळ्या या महाराष्ट्र राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, भुसावळ, जालना, या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे आगमन इंदापूर तालुक्यात झाले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. मिनी ट्रॅक्टर व डबल ट्रॉली ट्रॅक्टर आणि ट्रक याचा उपयोग करून यांत्रिक वाहतुकीवर भर दिला आहे. परिसरातील तोडलेला ऊस वाहतूक लवकरच वेळेत पोहच होऊ शकणार असल्याने अल्प मजूर संख्येत वाहतूक व्यवस्थेत फायदा होणार असून व कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढण्याची ऊस तोड कामगार यांनी सांगितले. चालू वर्षी पावसाळा हंगाम वेळेत आल्याने शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. साखर कारखाना गाळप  क्षमतेसाठी ऊस टनेज वाडीचा जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड