शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

उपपदार्थ निर्मितीमुळे साखर उद्योगाला उभारी : आमदार संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर ...

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर उद्योगात होत नेहमी होत असलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा. उसाच्या बाजारभाव स्पर्धेत टिकायचे असेल तंत्रज्ञानाच्या वापराने उपपदार्थांची निर्मिती करायला हवी यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्त्वाची आहे, असे राजगड' कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांनी मत व्यक्त केले.

भोर तालुक्यातील अनंतनगर-निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक, संचालक व माजी मंत्री अनंतराव थोपटे व कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष विकास कोंडे, मुंबई बाजार समितीचे उपाध्याक्ष धनंजय वाडकर, संचालक किसनराव सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, पोपटराव सुके, राजेश काळे, शंकरराव धाडवे पाटील, शोभा जाधव, संभाजी मांगडे, विट्ठल कुंडले तसेच उत्तम थोपटे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र कोंडे, संदीप नगीने, सोमनाथ वचकल, ज्ञानेश्वर कोंडे, कार्यकारी संचालक सुनीता महिंद, अंकुश इंगुळकर, राजेंद्र राजेशिर्के आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने इथेनॉल बाबत घेतलेले निर्णय व इथेनॉलला मिळणारा दर लक्षात घेवून राजगड सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करण्याचे ठरविले आहे. इथेनॉलचे एक कोटी लिटर उत्पादन करण्यासाठी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करून इथेनॉल निर्मिती करीत भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तेल कंपन्यांशी करार केला आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार इथेनॉलचा पुरवठा केला जाणार आहे. उपपदार्थ प्रकल्पातून आणि साखर उत्पादनातून ऊस उत्पादकांना योग्य दर देऊन सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे यावेळी आ. थोपटे यांनी सांगितले.

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ३० व्या गळीत हंगामात ४८ दिवसांत ६५ हजार ७७५ मेट्रिक टन ऊस गाळप झाले, साखर उत्पादन ५६ हजार २०० पोती झाले तर साखर उतारा सरासरी ८.७७टक्के आहे. गळीत हंगाम एप्रिल महिना अखेरपर्यंत २ लाख ५० हजार मेट्रिक टन उद्दिष्ट आहे, असे आ. थोपटे यांनी सांगितले.

आज अखेर ४८ दिवसांमध्ये ६५हजार७७५ मे. टन ऊसाचे गाळप करून ५६२०० साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा ८.७७ टक्के आलेला आहे. कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास पहिल्या हप्त्याचे पेमेंट लवकरच दिला जाईल. कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ साठी अडीचलाख मे. टनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व पुरवठारधारक यांनी आपला नोंदलेला सर्व ऊस राजगड साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनील महिंद यांनी दिली.

"राजगड कारखाना डिस्टिलरी प्रकल्प यासह १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती करणार आहे.

आ. संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड सह. साखर कारखाना

राजगड इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करताना माजी मंत्री अनंतराव थोपटे,आमदार संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.