शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

उपपदार्थ निर्मितीमुळे साखर उद्योगाला उभारी : आमदार संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर ...

नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर उद्योगात होत नेहमी होत असलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा. उसाच्या बाजारभाव स्पर्धेत टिकायचे असेल तंत्रज्ञानाच्या वापराने उपपदार्थांची निर्मिती करायला हवी यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्त्वाची आहे, असे राजगड' कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांनी मत व्यक्त केले.

भोर तालुक्यातील अनंतनगर-निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक, संचालक व माजी मंत्री अनंतराव थोपटे व कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष विकास कोंडे, मुंबई बाजार समितीचे उपाध्याक्ष धनंजय वाडकर, संचालक किसनराव सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, पोपटराव सुके, राजेश काळे, शंकरराव धाडवे पाटील, शोभा जाधव, संभाजी मांगडे, विट्ठल कुंडले तसेच उत्तम थोपटे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र कोंडे, संदीप नगीने, सोमनाथ वचकल, ज्ञानेश्वर कोंडे, कार्यकारी संचालक सुनीता महिंद, अंकुश इंगुळकर, राजेंद्र राजेशिर्के आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने इथेनॉल बाबत घेतलेले निर्णय व इथेनॉलला मिळणारा दर लक्षात घेवून राजगड सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करण्याचे ठरविले आहे. इथेनॉलचे एक कोटी लिटर उत्पादन करण्यासाठी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करून इथेनॉल निर्मिती करीत भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तेल कंपन्यांशी करार केला आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार इथेनॉलचा पुरवठा केला जाणार आहे. उपपदार्थ प्रकल्पातून आणि साखर उत्पादनातून ऊस उत्पादकांना योग्य दर देऊन सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे यावेळी आ. थोपटे यांनी सांगितले.

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ३० व्या गळीत हंगामात ४८ दिवसांत ६५ हजार ७७५ मेट्रिक टन ऊस गाळप झाले, साखर उत्पादन ५६ हजार २०० पोती झाले तर साखर उतारा सरासरी ८.७७टक्के आहे. गळीत हंगाम एप्रिल महिना अखेरपर्यंत २ लाख ५० हजार मेट्रिक टन उद्दिष्ट आहे, असे आ. थोपटे यांनी सांगितले.

आज अखेर ४८ दिवसांमध्ये ६५हजार७७५ मे. टन ऊसाचे गाळप करून ५६२०० साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा ८.७७ टक्के आलेला आहे. कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास पहिल्या हप्त्याचे पेमेंट लवकरच दिला जाईल. कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ साठी अडीचलाख मे. टनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व पुरवठारधारक यांनी आपला नोंदलेला सर्व ऊस राजगड साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनील महिंद यांनी दिली.

"राजगड कारखाना डिस्टिलरी प्रकल्प यासह १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती करणार आहे.

आ. संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड सह. साखर कारखाना

राजगड इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करताना माजी मंत्री अनंतराव थोपटे,आमदार संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.