शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले

By admin | Updated: October 16, 2015 22:31 IST

राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे. यामध्ये यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडे केवळ ५० साखर कारखान्यांनी गाळप परवाण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्या कारखान्यांच्या क्षेत्रांत उपलब्ध असलेला ऊस विचारात घेऊन व प्रस्तावाची पडताळणी करून ऊस गाळपाला परवानगी दिली जाणार आहे.राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना गाळप हंगामासाठी ऊस उपलब्ध नसल्याने त्यांचे बॉयलर पेटतील किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु, राज्याच्या ऊस गाळप हंगामाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले असून, १५ आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात पहिल्या दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांनी बॉयलर पेटवले. प्रादेशिक स्तरावर १७२ कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी होऊन त्यातील ५० कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात अंतिम मान्यतेसाठी सादर झाले आहेत.यावेळी प्रथमच ऊस गाळप परवाना देताना संबंधित साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसदराची एफआरपीची ७५ टक्के रक्कम देणे बंधनकारक आहे. गेल्या हंगामातील संपूर्ण जमाखर्चाला मान्यता घेणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एकही गाळप परवाना दिलेला नाही. साखर कारखान्यांनी सध्या त्यांचे बॉयलर पेटविले आहेत. देशात अन्यत्र पावसाने फटका दिल्याने साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आहे.>>राज्यात दुष्काळामुळे मराठवाडा, सोलापूर आणि नगर जिल्ह्णांत उसाची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे या काही जिल्ह्णाच्या गाळप हंगामाचे स्वतंत्रपणे नियोजन सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही.>>साखर उद्योगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, परवानगी मिळाल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर या बॉयलरमध्ये मुळी टाकून गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा सुमारे ७०० ते ७५० लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज आहे.