शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वनजमिनींचे पुरावे सादर करा

By admin | Updated: July 4, 2017 03:10 IST

वन जमिनी मध्ये बेकायदेशीर प्रवेश अथवा वास्तव्य न करता २००५ पूर्वीचे वन जमिनीवरील वास्तव्य असलेले पुरावे व अन्य कागदपत्रे आदिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : वन जमिनी मध्ये बेकायदेशीर प्रवेश अथवा वास्तव्य न करता २००५ पूर्वीचे वन जमिनीवरील वास्तव्य असलेले पुरावे व अन्य कागदपत्रे आदिवासी बांधवानी स्थानिक वन हक्क समितीकडे सादर करावेत. सरकारच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेऊन वन जमिनीचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आंबेगाव-जुन्नरचे उप विभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे.वडगाव कांदळी परिसरातील वन विभागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या जुन्नर वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांवर काल रविवारी (दि.२) लोकशासन आंदोलन संघटनेच्या युवकांनी दगडफेक केली. या संदर्भांत कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी वन विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, पोलीस अधिकारी व लोकशासन संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्तिक समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, जुन्नर उप विभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, जुन्नर वन विभागाचे वन संरक्षक अर्जुन म्हसे, तहसीलदार किरण काकडे, पंचायत समितीचे गट विकास अधिकरी सतीश गाढवे, सहाय्यक वन संरक्षक श्रीमंत गायकवाड, युवराज मोहिते, लोकशासन संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, सदस्य उपस्थित होते.या बैठकीत उप विभागीय अधिकारी अजित देशमुख म्हणाले, आदिवासी बांधव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील १३ डिंसेबर २००५ पूर्वीचे रहिवाशी अथवा वास्तव्य करीत असल्याचे कमीत कमी दोन पुरावे वन हक्क समितीकडे सादर करावेत. वन समिती कागद पत्रांची शहानिशा करून महसूल व वन विभागाकडे अहवाल सादर करेल. त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल. कायदेशीर पुरावा असल्याशिवाय कोणीही झोपड्या अथवा वन जमिनीवर अतिक्रमण करून नये. ज्या क्षेत्रात वन हक्क समिती नाही त्या समितीची स्थापना १५ आॅगस्ट २०१७ ला करण्यात येणार आहे. १८ जुलै २०१७ ला जुन्नर तहसील कार्यालयात समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या समितीमध्ये महसूल, वन विभाग, पंचायत समिती, पोलीस विभाग यांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी या वेळी दिली. पोलीस आधिकारी जयश्री देसाई म्हणाल्या, कोणीही सरकारी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करू नये. कायदेशीर मार्गाचा अवलंब करून वन विभागांशी समन्वय साधून जमिनीचे प्रश्न सोडवा. योग्य त्या न्यायालयात दाद मागा. कायदा सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कोणालाही पाठीशी न घालता कडक कारवाई केली जाईल.जुन्नर वन विभागाचे वन संरक्षक अर्जुन म्हसे म्हणाले, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आदी वन विभागांच्या राखीव क्षेत्रात कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करून झोपड्या बांधून वास्तव्य करून वन संपत्तीचे नुकसान करू नये. ज्यांच्याकडे २००५ सालापूर्वीचे पुरावे असतील त्यांनी कायदेशीर मागार्ने सरकार कडून परवानगी आणावी. या पुढेही वन क्षेत्रात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्त सुरूच ठेवणार आहेत. जुन्नर विभागांच्या वन क्षेत्रात अनधिकृत पणे ताबा घेणारे स्थानिक नसून बाहेरील जिल्ह्यातील असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असून जे अनधिकृत ताबा घेत आहेत त्यांची कागदपत्रे, स्थावर मालमत्ता व इतर सुख सुविधा, आर्थिक बाबीची माहिती गोळा करण्याची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. जर कोणी वन जमिनीवर ताबा, झोपड्या, वास्तव्य करेल त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा म्हसे यांनी दिला आहे.