शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बैलगाडा शर्यतीबाबतचे विधेयक सादर करा, आढळरावांची लोकसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:21 IST

नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली.

मंचर - नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली.बैलगाडा शर्यती प्रश्नावर आढळराव पाटील यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत मागणी करताना म्हटले की बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा असलेली स्पर्धा असून ग्रामीण भागातील शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तत्कालीन केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण व वन विभागामार्फत सन २०११ मध्ये क्रूरतेपासून संरक्षण करण्याच्या १९६० च्या कायद्यात बदल करण्यात येऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.ही बंदी ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. याबाबत महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू राज्य सरकारप्रमाणेच राष्ट्रपतींच्या मान्यतेने वटहुकूम काढून बैलगाडा शर्यतींना मान्यता दिली आहे. तमिळनाडू सरकारने तमिळनाडू विधानसभेमध्ये राष्ट्रपतींच्या मान्यतेने वटहुकूम काढून जलिकट्टू स्पर्धा सुरू केल्या आहेत.या स्पर्धांना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबरोबरच बंदी लावण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयात प्राणिमित्र संघटनांनी याविरोधात दावा दाखल केल्याने या शर्यतींना अद्याप मान्यता मिळाली नाही.त्यामुळे तमिळनाडूमध्ये जलिकट्टू सुरू असून महाराष्ट्रात मात्र मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिल्यामुळे आजपर्यंत ही बंदी उठू शकली नाही. शेतकºयांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे महाराष्ट्रातील लोक आता आंदोलने व इतर बेकायदेशीर पद्धतीने कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहे.बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, ही शेतकºयांची न्याय मागणी असून, याविषयीचा कायदा पारित करणे हा एकमेव कायमस्वरूपी मार्ग आहे. यासाठी केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीविषयीचे विधेयक तातडीने दोन्ही सभागृहांसमोर मांडून याविषयीचा कायदा करावा, अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत आढळराव पाटील यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव