शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

‘श्रीनाथ म्हस्कोबा’च्या साखर शाळेत विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:48 IST

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामात कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांसाठी साखर शाळा सुरु करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली.

पाटेठाण : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामात कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांसाठी साखर शाळा सुरु करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. गळीत हंगामात जवळपास पाचशेपेक्षा जास्त कुटुंबे स्थायिक झाली असून, ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी कारखान्याच्या पक्क्या इमारतीमध्ये गेली नऊ-दहा वर्षांपासून साखर शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेठाणच्या नियंत्रणाखाली भरत आहे.गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊसतोड मजुरांचे नोव्हेंबरपासून आगमन झाल्यानंतर केन्द्र प्रमुख संपत सटाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाटेठाण येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मारुती आडसूळ, सहकारी उपशिक्षक सुभाष शिंदे, राजेन्द्र गावडे, हरिभाऊ थोरात, संतोष कुंभार, आनंद भोसले यांनी कामगारांच्या वस्तीकडे जाऊन मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत मजूर कामगारांच्या भेटी घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रोत्साहित करण्यात आले. पहिली ते सातवीपर्यंत सत्तर पटसंख्या असून, दररोज उपस्थित राहून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहे. संतोष सोनवणे, मीरा मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत.स्थलांतरित व आर्थिक मागास मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी कारखाना व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असून, गेल्या तीन वर्षांपासून ऊसतोड व वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी तळेगाव येथे मोफत वसतिगृहदेखील चालवण्यात येत असून याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, शेतकरी परिसंवाद, आरोग्य शिबिर अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.- पांडुरंग राऊत, अध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण

टॅग्स :Educationशिक्षणSugar factoryसाखर कारखाने