शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

विद्यार्थ्यांची ‘आयटीआय’ला पसंती, राज्यात ८४ टक्के प्रवेश : रिक्त जागा व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:09 IST

राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.

पुणे : राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, रिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणकी एक संधी देण्यात आली.राज्यात शासकीय संस्थांमध्ये या वर्षी ९३ हजार ४७६ तर खासगी संस्थांमध्ये ४२ हजार ६७४ एवढी अशी एकूण १ लाख ३६ हजार १५० प्रवेशक्षमता आहे. त्यासाठी तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दि. ४ सप्टेंबर अखेरपर्यंत शासकीय संस्थांमध्ये ८४ हजार ७८१ तर खासगी संस्थांमध्ये ३० हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यानुसार सध्या अनुक्रमे ८ हजार ६९५ व १२ हजार ४७३ अशा एकूण २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशाचा विचार केल्यास यंदाही जवळपास ४० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या तुलनेत आयटीआयचे प्रवेश सुमारे ८४ टक्के झाले आहेत. त्यातच रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे.त्यामुळे यातील आणखी काही जागा भरतील. ‘केवळ कमी मागणी असलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश कमी झाले आहेत. हे व्यवसाय स्वयंरोजगारासाठी उपलब्ध आहेत. इतर व्यवसायांना चांगला प्रतिसाद आहे,’ असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक अनिल जाधव यांनी सांगितले.शासकीय संस्थांमध्ये एकूण ८ हजार ६९५ जागा, तर खासगी संस्थांमध्ये १२ हजार ४७३ जागा रिक्त आहेत. अद्याप आॅनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना दि. १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून प्रवेश अर्ज भरावा लागेल. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. शासकीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी दि. १३ सप्टेंबर रोजी विशेष समुपदेशन फेरी घेतली जाणार आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष संबंधित संस्थेत हजर राहावे लागेल. हजर विद्यार्थ्यांची गुणवत्तायादी लावून त्यानुसार प्रवेश दिला जाईल. खासगी संस्थांमध्ये दि. १३ सप्टेंबरपर्यंत संबंधित संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेता येईल.

टॅग्स :Studentविद्यार्थी