शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कृषी सेवक भरतीत बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:37 IST

राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देचारही कृषी विद्यापीठांच्या अधिष्ठातांना (कृषी) या विद्यालयांची माहिती घेण्याबाबत आदेशराज्यात केवळ चारच कृषी विद्यापीठे अधिकृत

पुणे : राज्यात सुरू असलेल्या कृषी सेवक भरती प्रक्रियेत बोगस विद्यापीठाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालकांनी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून माहिती मागविली आहे. हे विद्यापीठ बोगस असल्याचे परिषदेने यापुर्वीच जाहीर केले आहे. राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा पार पडली असून पात्र उमेदवारांची निवडही करण्यात आली आहे. या निवडप्रक्रियेमध्ये एका विद्यार्थ्याने सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाची पदविका घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी विभागीय कृशी सहसंचालकांनी संबंधित विद्यापीठाला मान्यतेबाबत विचारणा केली होती. त्यावर विद्यापीठाने या पदविकेला मान्यता मिळाल्याचे कळविले. तशी कागदपत्रेही सादर केली आहे. मात्र, याबाबत साशंकता निर्माण झाल्याने सहसंचालकांनी कृषी परिषदेकडे प्रस्ताव पाठवून या विद्यापीठाबाबत माहिती मागविली आहे. याविषयी माहिती देताना परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे १९८३ या कायद्यानुसार राज्यात केवळ चारच कृषी विद्यापीठे अधिकृत आहेत. या विद्यापीठांव्यतिरिक्त कृषी अभ्यासक्रम राबविण्यास इतर कोणत्याही विद्यापीठाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ हे अनधिकृत आहे. या विद्यापीठात राज्यात ठिकठिकाणी विविध विद्यालयेही आहेत. त्याना कृषी परिषद किंवा चारही विद्यापीठांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ही विद्यालये आणि त्यांनी दिलेली पदवीही अनधिकृत ठरते. परिणामी कोणत्याही नोकरीसाठी ही पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. राज्यात या विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याबाबत परिषदेकडे अद्याप आकडेवारी उपलब्ध नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय मागासवर्ग कृषी विद्यालये, माहिती व तंत्रज्ञान विद्यालय या नावाने सुमारे ६२ विद्यालये सुरू केल्याची माहिती परिषदेकडे आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यालये सोलापूर जिल्हयात २३ आहेत. तसेच पुणे, ठाणे, कोल्हापुर, सांगली, जळगाव, धुळे, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, ठाणे, अकोला, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही ही विद्यालये सुरू आहेत. याबाबतची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. चारही कृषी विद्यापीठांच्या अधिष्ठातांना (कृषी) या विद्यालयांची माहिती घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या विद्यालयांचा शोध घेऊन तेथील विद्यार्थ्यांची संख्या व इतर माहितीचा अहवाल तयार करण्यात करण्यास सांगण्यात आले आहे.

.............

हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यातअनधिकृत विद्यापीठ मागील दोन वर्षापासून सुरू असून संलग्न विद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कृषी सेवक भरतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच या विद्यापीठाची पदवी समोर आली आहे. विद्यापीठातून पदविका अभ्यासक्रमाची पहिलीच तुकडी बाहेर पडल्याने यावर्षी विविध अभ्यासक्रम तसेच शासकीय व खासगी नोकºयांमध्ये हे विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. तसेच कृषी भरतीतही आणखी काही विद्यार्थी असू शकतात. मात्र, हे विद्यापीठच अनधिकृत असल्याने या विद्यार्थ्यांची पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. - डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक (शिक्षण)महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद-----------

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीuniversityविद्यापीठ