शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:52 IST

शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.

कान्हूर मेसाई - शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेत आणखी दिवस जाणार आहेत. केंद्र सरकारने गत काही महिन्यांत देशात सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाला समग्र शिक्षा अभियानात समाविष्ट केले आहे. केंद्रच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकारात येत असलेल्या या समग्र शिक्षा अभियानाकडून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आत्तापर्यंत ४00 रुपये दिले जायचे. मात्र एवढ्या अल्पशा रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड झाल्याने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून २00 रुपयांची वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यासाठी ६00 रुपयांची तरतूद केली आहे.या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचा निधी सोपवून विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानुसार मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच वाटप करण्यातआली. त्याप्रमाणेच मोफत गणवेशदेखील पहिल्या दिवसापासूनच मिळणे अपेक्षित होते. मात्र शालेय गणवेशासाठीचा निधीला विलंब झाल्याने आतापर्यंत जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.पंचायत समितीकडे निधी सुपूर्त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार याना विचारले असता, गणवेश निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून शाळेकडे पात्र विद्यार्थी संख्येनुसार निधी वितरित केला जाईल. त्यानुसार हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले जाणार आहे. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कान्हूर मेसाई येथील माजी उपसरपंच दीपक तळोले व माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी केली आहे.शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका!शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, त्या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभवलक्षात घेता या वर्षी संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका मुख्य राहणार आहे.गेल्या वर्षीपासून गणवेशाचे पैैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरूवात केली. यामुळे अर्धे वर्षे बँकेत खाती काढण्यात गेली. त्यानंतर काहींचे पैैसे झाले तर काहींना पैैसै मिळालेच नाहीत. त्यामुळे गेले वर्षे गणवेशा विनाच गेले.या वर्षी तरी वेळेत प्रक्रिया होवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी