शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:52 IST

शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.

कान्हूर मेसाई - शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेत आणखी दिवस जाणार आहेत. केंद्र सरकारने गत काही महिन्यांत देशात सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाला समग्र शिक्षा अभियानात समाविष्ट केले आहे. केंद्रच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकारात येत असलेल्या या समग्र शिक्षा अभियानाकडून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आत्तापर्यंत ४00 रुपये दिले जायचे. मात्र एवढ्या अल्पशा रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड झाल्याने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून २00 रुपयांची वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यासाठी ६00 रुपयांची तरतूद केली आहे.या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचा निधी सोपवून विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानुसार मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच वाटप करण्यातआली. त्याप्रमाणेच मोफत गणवेशदेखील पहिल्या दिवसापासूनच मिळणे अपेक्षित होते. मात्र शालेय गणवेशासाठीचा निधीला विलंब झाल्याने आतापर्यंत जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.पंचायत समितीकडे निधी सुपूर्त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार याना विचारले असता, गणवेश निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून शाळेकडे पात्र विद्यार्थी संख्येनुसार निधी वितरित केला जाईल. त्यानुसार हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले जाणार आहे. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कान्हूर मेसाई येथील माजी उपसरपंच दीपक तळोले व माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी केली आहे.शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका!शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, त्या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभवलक्षात घेता या वर्षी संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका मुख्य राहणार आहे.गेल्या वर्षीपासून गणवेशाचे पैैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरूवात केली. यामुळे अर्धे वर्षे बँकेत खाती काढण्यात गेली. त्यानंतर काहींचे पैैसे झाले तर काहींना पैैसै मिळालेच नाहीत. त्यामुळे गेले वर्षे गणवेशा विनाच गेले.या वर्षी तरी वेळेत प्रक्रिया होवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी