शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:52 IST

शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.

कान्हूर मेसाई - शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेत आणखी दिवस जाणार आहेत. केंद्र सरकारने गत काही महिन्यांत देशात सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाला समग्र शिक्षा अभियानात समाविष्ट केले आहे. केंद्रच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकारात येत असलेल्या या समग्र शिक्षा अभियानाकडून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आत्तापर्यंत ४00 रुपये दिले जायचे. मात्र एवढ्या अल्पशा रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड झाल्याने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून २00 रुपयांची वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यासाठी ६00 रुपयांची तरतूद केली आहे.या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचा निधी सोपवून विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानुसार मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच वाटप करण्यातआली. त्याप्रमाणेच मोफत गणवेशदेखील पहिल्या दिवसापासूनच मिळणे अपेक्षित होते. मात्र शालेय गणवेशासाठीचा निधीला विलंब झाल्याने आतापर्यंत जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.पंचायत समितीकडे निधी सुपूर्त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार याना विचारले असता, गणवेश निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून शाळेकडे पात्र विद्यार्थी संख्येनुसार निधी वितरित केला जाईल. त्यानुसार हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले जाणार आहे. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कान्हूर मेसाई येथील माजी उपसरपंच दीपक तळोले व माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी केली आहे.शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका!शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, त्या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभवलक्षात घेता या वर्षी संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका मुख्य राहणार आहे.गेल्या वर्षीपासून गणवेशाचे पैैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरूवात केली. यामुळे अर्धे वर्षे बँकेत खाती काढण्यात गेली. त्यानंतर काहींचे पैैसे झाले तर काहींना पैैसै मिळालेच नाहीत. त्यामुळे गेले वर्षे गणवेशा विनाच गेले.या वर्षी तरी वेळेत प्रक्रिया होवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी