शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अल्कली अमाइन्सविरोधात कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 13:45 IST

अल्कली कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेच्या विरोधात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देअल्कली कंपनीत असलेला हायड्रोजनचा साठा पाहता भीती व अफवेच्या वातावरणाने तणाव

कुरकुंभ : अल्कली अमाइन्स कंपनीला लागलेल्या आगीमुळे बुधवारी रात्री कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी, झगडेवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये अफवांचे पेव फुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता. हजारो कुटुंबे भीतीने पलायन करू लागली होती. परिस्थिती निवळल्यानंतर ग्रामस्थ माघारी आले. मात्र, त्यामुळे प्रचंड गदारोळ व मानसिक ताणातून नागरिकांनी स्थलांतर केले होते.  अल्कली कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेच्या विरोधात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करीत शुक्रवारी (दि. १६) निषेध करीत कडकडीत बंद पाळला.अल्कली अमाइन्स या कंपनीत वापरले जाणारे विविध रसायन प्रक्रियेतून निघणारे घातक रसायन (डीमापा) स्टोरेज यार्डमध्ये ठेवले होते. सुमारे ३० टनापेक्षा जास्त साठा असलेल्या कंपनीचा परिसर कामगार विरहित असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, अल्कली कंपनीत असलेला हायड्रोजनचा साठा पाहता भीतीच्या व अफवेच्या वातावरणाने तणाव निर्माण केला. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दल, पुणे, इंदापूर, बारामती, ऑनर कंपनी व इतर कंपनीतील दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचे स्वरूप मोठे असल्याने रात्री एकपर्यंत हे काम सुरू होते. रासायनिक द्रव्यांनी भरलेले ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीचे लोट उंच आकाशात पसरत होते. दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, नियोजनाच्या अभावाने फक्त तटस्थ उभे राहण्यापलीकडे त्यांना काहीच करता आले नाही. दुसरीकडे हजारो ग्रामस्थ पलायन करीत असताना कुठल्याही शासकीय अधिकाºयाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडलेला दिसून आला. बुधवारी रात्री उशिरा आमदार राहुल कुल यांनीदेखील घटनेची तीव्रता लक्षात घेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेबाबत तत्काळ कारवाईची ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी आणि आणि अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे वासुदेव काळे आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरात काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांना शांतात ठेवून प्रशासनाला पुढील कारवाई करू देण्याचे आवाहन कुल यांनी केले.  अल्कली अमाइन्सचे अधिकारी राकेश गोयल, उदय घाग, राजेश कावले, राजीव खेर यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वारंवार लागणाºया आगीचे कारण त्यांना देता आले नाही. तसेच त्यांनी किती आर्थिक नुकसान झाले, याबाबतही बोलणे टाळले........*अल्कली अमाइन्स कंपनीतील आगीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन व पसरलेले भीतीचे वातावरण, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्यांना व विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाशी बोलू न देता प्रवेशद्वारावरच अडवून धरले.

* कंपनीविरोधात बोलणाऱ्या नागरिकांना दम देत राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करून पिटाळून लावले. बुधवारी रात्री एवढी मोठी घटना घडूनदेखील अल्कली कंपनीविरोधात काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांना मात्र बळाच्या जोरावर गप्प करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

* अल्कली अमाइन्स कंपनीतील आगीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन व पसरलेले भीतीचे वातावरण, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्यांना व विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाशी बोलू न देता प्रवेशद्वारावरच अडवून धरले.

 

टॅग्स :KurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीfireआग