शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वाड्यांच्या विकासाचा मार्ग खडतरच; एफएसआयचा वाद, राज्य सरकारची मंजुरी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:22 IST

शहरातील जुन्या वाड्यांच्या विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून महापालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचा अहवाल प्रशासनाला मिळाला असून त्यात दिलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक मोजण्याच्या पद्धतीवरून काही मतभेद निर्माण झाले आहेत.

पुणे : शहरातील जुन्या वाड्यांच्या विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून महापालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचा अहवाल प्रशासनाला मिळाला असून त्यात दिलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक मोजण्याच्या पद्धतीवरून काही मतभेद निर्माण झाले आहेत.ऐतिहासिक ओळख असलेल्या पुण्यात किमान १० हजार जुने वाडे आहेत. त्यापैकी जे मोठे वाडे होते ते त्यांच्या मालकांनी बांधकाम व्यावसायिकांना विकून त्या ठिकाणी मोठ्या इमारती बांधल्या. मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्याबरोबरच त्या वाड्यातील जुन्या भाडेकरूंचाही यात फायदा झाला. मात्र ज्या वाड्यांचे क्षेत्रफळ कमी होते त्यात असे काहीच होणार नसल्याने ते वाडे तसेच पडिक राहिले आहेत. त्यांच्या विकासाचा मार्ग खुंटला होता.नगरसेवक विशाल धनवडे यांनी सर्वसाधारण सभेत याविषयी विचारणा केल्यानंतर याला गती मिळाली. जवळजवळ असणाºया काही वाड्यांच्या मालकांनी एकत्र येऊन सामूहिक बांधकाम करण्याचा प्रयोग (क्लस्टर डेव्हलपमेंट) मुंबईत राबविला गेला होता. त्याच धर्तीवर पुण्यातही परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे महापालिकेने केली. त्यावर राज्य सरकारने असे करण्याआधी सामूहिक बांधकाम केल्यानंतर रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आदी समस्यांवर किती ताण येईल, जादा एफएसआय किती द्यावा लागेल, तो तसा द्यायचा या व अन्य काही गोष्टींचा अभ्यास करण्याची सूचना केली. त्यासाठी मुंबईत याच विषयावर काम केलेल्या कंपनीचा संदर्भही दिला. महापालिकेने या कंपनीला काम दिले. त्यांचा अहवाल आता आला आहे. त्यात नागरी समस्यांच्या ताणाबरोबरच आणखी काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. १० हजार चौरस फुटांवर असे बांधकाम करता येईल. त्यात तीन-चार किंवा आणखी काही वाडे असले तरी चालेल. १० हजारपैकी साधारण ४० हजार चौरस फुटांवर बांधकाम करता येईल. म्हणजे त्या जागेवर ७ ते ८ मजली इमारत उभी राहू शकते. जादा एफएसआय देताना त्यात इमारतीची गॅलरी, सदनिकांसमोरच्या रिकाम्या जागा (कॉमन पॅसेज) हेही एफएसआयमध्ये मोजण्यात आले आहे. विशाल धनवडे यांनी सांगितले, की असे केले तर त्यात बांधकाम व्यावसायिकाबरोबरच तिथे राहणाºया जुन्या भाडेकरूंचाही तोटा आहे. त्यांना कमी जागा मिळेल. त्यामुळे यात बदल व्हायला हवा. बांधकाम व्यावसायिकाबरोबरच जागामालक, भाडेकरू यांचाही फायदा झाला तरच ही योजना फलदायी ठरणार आहे. तसे होत नसेल तर कोणीच यासाठी पुढे येणार नाही. तसेच १० हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असेल तरीही त्यांना परवानगी द्यायला हवी. म्हणजे जास्त वाडे या विकास योजनेसाठी पुढे येतील व शहरात जास्त सदनिका उपलब्ध होतील.महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे परदेश दौºयावर गेले आहेत. ते आले, की त्यांच्यासमोर कंपनीचा अहवाल ठेवण्यात येईल. त्यावर चर्चा होऊन नंतर तो सर्वसाधारण सभेकडे व त्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :Puneपुणे