शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

वारकऱ्यांसाठी मध्यरात्री दारे खुली करणाऱ्या डॉ दानिश खान यांची गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 18:39 IST

 जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहृदयी व्यक्तीचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. ही व्यक्ती आहे संगमनेरचे डॉ दानिश खान. प्रेम, बंधुता, संवेनशीलता कमी होत असल्याच्या काळात खान यांनी मात्र पुन्हा एकदा माणुसकीच्या मूल्यांवरचा विश्वास गाढ केला आहे. 

पुणे : जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहृदयी व्यक्तीचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. ही व्यक्ती आहे संगमनेरचे डॉ दानिश खान. 

रात्री वारकऱ्यांची गाडी बंद पडली असताना त्यांची सोय स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये करणाऱ्या खान यांनी दाखवलेल्या अगत्याने भारावलेल्या एका वारकऱ्यानेच पोस्ट लिहून त्यांचे कौतुक केले आहे. ही पोस्ट सध्या व्हॉट्स ऍपवर व्हायरल झाली आहे. खान हे संगमनेर नगरपरिषेदेचे अपक्ष नगरसेवकही आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणमधून सुमारे चाळीस वारकरी त्यांची दिंडी घेऊन गाडीतून शिर्डी, वणीची देवी असे दर्शन घेऊन देहू आणि आळंदी मार्गे पंढरपूरला निघाले होते. मात्र अचानक त्यांची गाडी रात्री उशिरा संगमनेर येथील जोर्वे नाका रस्त्याजवळ बंद पडली. त्यात महिलांचाही समावेश होता. मात्र गाडीची दुरुस्ती मोठी असल्याने रात्र जाईल असे दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. अनोळखी गाव, अनोळखी माणसे आणि पावसाळी वातावरण अशावेळी राहायचे तरी कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हा त्यांना एका व्यक्तीने जवळच असलेल्या देवी गल्लीतल्या देवीच्या मंदिराचा पत्ता दिला. तिथे रात्र काढू असा विचार करून मंडळी आली आणि बघितलं तर नेमके त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असल्याने तिथे मुक्काम करण्यासारखी स्थिती नव्हती. 

अखेर वारकरी मंदिराच्या समोर असलेल्या घराच्या आडोशाखाली उभे राहिले. तेवढ्यात समोर असलेल्या सेवा हॉस्पिटलमधून बाहेर येणाऱ्या डॉ खान यांना गर्दी दिसली. सवयीप्रमाणे त्यांनी गर्दीची चौकशी केली तर त्यांना वारकऱ्यांची अडचण समजली. त्यांनी विचार केला आणि वारकऱ्यांना हॉस्पिटलमधील रिकाम्या खाटांवर झोपणार का असे विचारले. वारकऱ्यांनीही होकार दिला. त्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये तर पुरुष मंडळी खान यांच्याच स्व.अय्युब खान हॉलमध्ये राहिले. एवढ्यावर खान थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांनी वारकऱ्यांना आन्हिके उरकण्याचीही सोय करून दिली. त्यानंतर सेवा फाउंडेशनतर्फे त्यांच्या जेवणाची सोय केली आणि गाडी व्यवस्थित असल्याची खात्री पटल्यावरच पाहुण्यांना निरोप दिला. यावेळी त्यांच्यासोबत काही मुस्लिम बांधवही उपस्थित होते. निरोपाच्यावेळी मात्र या बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीने वारकरीही भारावून गेले होते. 

याबाबत लोकमतशी बोलताना डॉ खान म्हणाले की, 'मी यात काहीही वेगळं केलेलं नाहीये. धर्म आणि जात याच्यापलीकडे ती सर्व माणसं आहेत हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. मला त्यांच्या भक्तीबाबत आदर आहे. त्यामुळे यंदापासून त्यांनी दरवर्षी आमचा पाहुणचार घेऊन, एक मुक्काम संगमनेरला करावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी अशी विनंती मी त्यांना केली'. प्रेम, बंधुता, संवेनशीलता कमी होत असल्याच्या काळात खान यांनी मात्र पुन्हा एकदा माणुसकीच्या मूल्यांवरचा विश्वास गाढ केला आहे. 

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाSangamnerसंगमनेरSocial Viralसोशल व्हायरलsocial workerसमाजसेवकMuslimमुस्लीम