शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अडथळे आले तरी कार्यरत रहा - डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:31 IST

एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो.

पुणे  - एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो. त्यात राजकीय नेते, समाज व सोशल मीडिया यामुळे अडथळे येऊ शकतात. या विलंब काळात आपल्याला खूप काही करता येऊ शकते. आपल्याला नक्की काय करायचे आहे आणि साधने कशी उपलब्ध करता येऊ शकतील याचा विचार करून समाजाने कृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘पोल व्होल्टिंग’ या खेळात शून्यातून सुरुवात करून उंच उडी घ्यायची असते. महत्त्वाकांक्षा ही एखाद्या संधीसारखी असून अडथळे आले तरी ते दूर करत अभ्यासपूर्णतेने कार्यरत राहायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ‘पोल व्हॉल्टिंग’ची संकल्पना स्पष्ट केली.पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) च्या वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रवी पंडित यांनी लिहिलेल्या ‘लीप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माशेलकर व रवी पंडित यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन केले. इस्त्राइलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का व सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया व प्रा. अमिताव मलिक उपस्थित होते.भारत ‘पोल व्हॉल्टिंग’मध्ये कुठे आहे? असे डॉ. माशेलकर यांना विचारले असता त्यांनी शासनाने कोणतीही योजना राबविण्यापूर्वी ग्रामीण भागातले वास्तव नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे याकडे लक्ष वेधले. नियोजनात केवळ सरकारवर अवलंबून राहू नये तर समाजानेही पुढाकार घ्यायला पाहिजे, असे सांगितले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.हे फक्त पुस्तक नाही तर महाभारत आहे. सर्वसामान्यांसाठी माहितीचा खजिना आहे. भारत चीनला कसा मागे टाकू शकेल यावर प्रकाश टाकणारे असेल असे वाटले होते. मात्र त्याहीपुढे जाऊन कल्पकपणे जगाचा स्वर्ग कसा बनविता येईल याची अनेक उदाहरणे मला या पुस्तकात पाहायला मिळाली.- अरुण फिरोदिया

टॅग्स :Puneपुणे