शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

डेंग्यू, मलेरियाने राज्य हैराण; डेंग्यूचे १० हजार रुग्ण, मुंबई टाॅपवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:39 IST

ठाणे-नाशिकही टॉप थ्री जिल्ह्यांमध्ये

पुणे : यावर्षी राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यांत डेंग्यू रुग्णांची संख्या १० हजार ५५३ इतकी प्रचंड वाढली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. मुंबईमध्ये ३ हजार ५५६, ठाण्यात ७०४ आणि नाशिकमध्ये ६०६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या जास्त असणारे हे टाॅप थ्री जिल्हे ठरले आहेत, तर उर्वरित रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली आहे.

 डेंग्यू हा पावसाळ्यात जास्त प्रमाणात फैलावणारा विषाणुजन्य आजार आहे. त्याचा फैलाव हा एडिस इजिप्टाय या डासांपासून हाेताे व ते डास साचलेल्या स्वच्छ किंवा घाण पाण्यात वाढतात. यावर्षी राज्यात साडेदहा हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने डेंग्यूचा धाेका वाढल्याचे दिसून येते. रुग्णालयांत येणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली आहे.

मलेरियाचेही ११ हजार रुग्ण

मलेरियाचेदेखील राज्यात प्रचंड रुग्ण वाढले आहेत. मलेरियाचे आतापर्यंत १० हजार ९७८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे गडचिराेली येथे असून, ही संख्या ४ हजार ५२५ इतकी आहे. त्याखालाेखाल मुंबई ४ हजार ५५४ आणि ठाण्यात ६५९ रुग्ण आढळून आले आहेत. 

 

लेप्टाेस्पायराेसिसचे १,२८३ रुग्ण

 राज्यात दूषित पाण्यातून पसरणाऱ्या लेप्टाेस्पायराेसिसचे १२८३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक १२१८, रायगड २५, तर ठाण्यात २८ रुग्ण आढळले आहेत. हा आजार रोगबाधित प्राणी मुख्यतः उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्यास हा रोग होतो.

अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अन्‌ ताप

nडेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. यामध्ये अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे हे प्रमुख लक्षणे आहेत. तर रक्तस्त्राव हाेणे ही डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याचासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.

सुरुवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनी भागावर (हातपाय, चेहरा व मान) आलेल्या पुरळांवरून केली जाऊ शकते. परंतु रक्तचाचणीवरून खरे निश्चित निदान हाेते.

टॅग्स :Puneपुणे