शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारचा वेळकाढूपणा : पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 00:55 IST

धनगर आरक्षणाबाबत टाटा कंपनीला काम देण्याचे काय कारण होते? समिती नेमणे म्हणजे, चौकशी करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे.

बारामती : धनगर आरक्षणाबाबत टाटा कंपनीला काम देण्याचे काय कारण होते? समिती नेमणे म्हणजे, चौकशी करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे. ते भाजपा सरकार करीत आहे. धनगर समाजाने साथ दिल्यानेच राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती येथे अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३व्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते, त्या वेळी शहरातील शारदा प्रांगण येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले, ‘‘२०१४मध्ये प्रथम बहुमताने भाजपाचे सरकार आले. नरेंद्र मोंदीमुळे ही किमया साधली गेली. त्यांनी त्या वेळी वेगवेगळ्या समाजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. आज त्यांच्याकडे बहुमत आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या उपोषणाच्या वेळी पहिल्याच ‘कॅबिनेट’ला आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मग का आरक्षण दिले जात नाही? का पंतप्रधान निर्णय घेत नाहीत? असा सवाल पवार यांनी केला.’’या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील धनगर आरक्षणाबाबत ‘क्या हुआ तेरा वादा?’ हा एकच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायचा असल्याचे सांगितले. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी राज्य सरकारवर, फसव्या सरकारचे काही खरे नाही. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने फसवणूक केल्याची टीका केली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, विजयराव मोरे, पौर्णिमा तावरे उपस्थित होते....मनाची तरी लाज कशी वाटत नाही?संत ज्ञानेश्वर, संत तुकाराममहाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. ९७ टक्के समाजाला क्षुद्र लेखणारा मनू सर्वश्रेष्ठ कसा होऊ शकतो? त्यांना जनांची नाही, मनाची तरी लाज कशी वाटत नाही? समाजात फूट पडेल, दुही माजेल, स्वत:ची राजकीय पोळी भाजून कशी घेता येईल? असाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.>...यांच्या ‘बा’नेनिर्णय घेतला होता का?मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी दुधाला ५ रुपये, दूध पावडरला ५० रुपये प्रतिकिीलो अनुदान देऊ सांगितले होते. नंतर मात्र परदेशात दूध पाठविल्यानंतर ५ रुपये देणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. घसरलेल्या दूधदरामुळे शेतकरी अडचणीत आहे. यांच्या ‘बा’ने निर्णय घेतला होता का? अशी टीका अजित पवार यांनी केली

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार