शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

कालवाबाधितांना एसआरएची घरे - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:26 IST

उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश

पुणे : दांडेकर पुलाजवळ फुटलेल्या कालव्यामुळे बाधित झालेल्या उर्वरित नागरिकांचे पंचनामे करण्याचे काम येत्या मंगळवारी (दि. २) जिल्हा प्रशासनाने पूर्ण करावे, तसेच बाधितांपैकी अधिकाधिक नागरिकांना नियमाच्या चौकटीत राहून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) घरे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे बाधितांना अन्न धान्य, गॅस व औषधे देण्याचे काम युद्धपातळीवर करावे, अशा सूचनाही बापट यांनी दिल्या.

कालवा दुर्घटनेनंतर केल्या जाणाºया उपाययोजनांचा गिरीश बापट यांनी आढावा घेतला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे आदी या आढावा बैठकीस उपस्थित होते. बापट म्हणाले, कालवा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर कालव्याच्या गळतीचे काम केले जाणार आहे. तसेच लवकरच कालव्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल.एसआरए योजने अंतर्गत बाधितांना घरे देता येतील का? याचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राजेंद्र नगर परिसरात 556 सदानिका आहेत.बाधित नागरिकांना तात्काळ उच्च प्रतिच्या गव्हाचे वितरण करावे.तसेच ज्यांना कमी प्रतिचा गहू दिला.त्यांना तो बदलून द्यावा,असे आदेश गिरीश बापट यांनी दिले.तीन कोटींचा निधी पाच ते सहा दिवसांत मिळणारकालवा दुर्घटना बाधितांच्या पुनर्वसनासाठी ३ कोटींचा निधी पुनर्वसन, वित्त विभागाकडून मंजूर झाला आहे. उपसमितीच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल.त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवसांत राज्य शासनाकडून जिल्हाधिकाºयांकडे तीन कोटींचा निधी प्राप्त होईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.गॅस व औषधाचे वितरणकालव्याच्या पाण्यामुळे काही नागरिकांचे गॅस सिलेंडर वाहून गेले, त्यामुळे स्थानिक गॅस एजन्सीच्या सहकार्याने सर्वांना गॅस उपलब्ध करून द्यावा,असे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही बापट यांनी नमूद केले.मंगळवारी उर्वरित बाधितांचे पंचनामेजिल्हा प्रशासनाचे 8 अधिकारी उर्वरित 50 ते 60 घरांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारी जाणार आहेत.पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यास काही कालवधी द्यावा लागतो.तसेच पंचनामे झाल्याशिवाय हे काम करता येत नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.उंदीर,घुशी बाबत बापटांचे मौनकालवा कशामुळे फुटला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.तसेच उंदीर, घुशी आणि खेकडे याबाबत मला काही बोलायचे नाही,असे गिरीश बापट यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.