शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कालवाबाधितांना एसआरएची घरे - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:26 IST

उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश

पुणे : दांडेकर पुलाजवळ फुटलेल्या कालव्यामुळे बाधित झालेल्या उर्वरित नागरिकांचे पंचनामे करण्याचे काम येत्या मंगळवारी (दि. २) जिल्हा प्रशासनाने पूर्ण करावे, तसेच बाधितांपैकी अधिकाधिक नागरिकांना नियमाच्या चौकटीत राहून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) घरे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे बाधितांना अन्न धान्य, गॅस व औषधे देण्याचे काम युद्धपातळीवर करावे, अशा सूचनाही बापट यांनी दिल्या.

कालवा दुर्घटनेनंतर केल्या जाणाºया उपाययोजनांचा गिरीश बापट यांनी आढावा घेतला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे आदी या आढावा बैठकीस उपस्थित होते. बापट म्हणाले, कालवा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर कालव्याच्या गळतीचे काम केले जाणार आहे. तसेच लवकरच कालव्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल.एसआरए योजने अंतर्गत बाधितांना घरे देता येतील का? याचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राजेंद्र नगर परिसरात 556 सदानिका आहेत.बाधित नागरिकांना तात्काळ उच्च प्रतिच्या गव्हाचे वितरण करावे.तसेच ज्यांना कमी प्रतिचा गहू दिला.त्यांना तो बदलून द्यावा,असे आदेश गिरीश बापट यांनी दिले.तीन कोटींचा निधी पाच ते सहा दिवसांत मिळणारकालवा दुर्घटना बाधितांच्या पुनर्वसनासाठी ३ कोटींचा निधी पुनर्वसन, वित्त विभागाकडून मंजूर झाला आहे. उपसमितीच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल.त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवसांत राज्य शासनाकडून जिल्हाधिकाºयांकडे तीन कोटींचा निधी प्राप्त होईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.गॅस व औषधाचे वितरणकालव्याच्या पाण्यामुळे काही नागरिकांचे गॅस सिलेंडर वाहून गेले, त्यामुळे स्थानिक गॅस एजन्सीच्या सहकार्याने सर्वांना गॅस उपलब्ध करून द्यावा,असे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही बापट यांनी नमूद केले.मंगळवारी उर्वरित बाधितांचे पंचनामेजिल्हा प्रशासनाचे 8 अधिकारी उर्वरित 50 ते 60 घरांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारी जाणार आहेत.पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यास काही कालवधी द्यावा लागतो.तसेच पंचनामे झाल्याशिवाय हे काम करता येत नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.उंदीर,घुशी बाबत बापटांचे मौनकालवा कशामुळे फुटला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.तसेच उंदीर, घुशी आणि खेकडे याबाबत मला काही बोलायचे नाही,असे गिरीश बापट यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.