शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

SPPU: पुणे विद्यापीठच दहशतीखाली; कसे शिकविणार अन् मुले काय शिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:40 IST

दरम्यान, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुपुरस्पर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली....

पुणे : ललित कला केंद्रातील ‘जब वी मेट’ नाटकाच्या प्रयोगावरून झालेल्या गोंधळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव मलिन झाले आहे. विद्यापीठामध्ये झुंडशाहीच्या जोरावर शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. या हल्ल्यामुळे विद्यापीठात भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात प्राध्यापकांनी कसे शिकवायचे अन् विद्यार्थी काय संशोधन करणार, असा सवाल उपस्थित करत या विरोधात योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सहकारी संघटनेने कुलगुरूंकडे केली आहे.

दरम्यान, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुपुरस्पर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा भाग म्हणून ‘जब वी मेट’ नाटकांचे शुक्रवारी (दि.२) सादरीकरण सरू होते. हे नाटक प्रहसन प्रकारातील होते. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखाव्यात यासाठी ते नाटक नव्हते. खरंतर कोकणातील दशावतारी नाटकास अनुसरून विद्यार्थ्यांच्या नाटकाचे मंथन सुरू होते. परंतु, संपूर्ण नाटक होण्यापूर्वीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कलाकारांवर हल्ला करत हा प्रयोग बंद पाडला. तसेच, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. पोलिसांनी विद्यार्थी व विभागप्रमुखांना अटक केल्याने याविरोधात सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले. त्या अटकेचा निषेध प्राध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

कॅम्पसमध्ये झुंडशाही अन् गळचेपी

अशा घटनांमुळे विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये भीती, दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामध्ये अध्यापन आणि संशोधन करणे कठीण झाले आहे. अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक संस्थेच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे. या स्वातंत्र्यावर विद्यापीठ परिसरात हिंसेचा वापर करून आक्रमण केले जात आहे. या सर्व कारणांमुळे विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांनी उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे कुलगुरूंना केली आहे.

प्राध्यापकांचे मुद्दे काय?

- ललित कला केंद्रातील हे प्रकरण विभागात सेवा बजावताना झाले असल्याने विद्यार्थी-प्राध्यापकांच्या न्यायिक प्रक्रियेची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.

- विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावरील पोलिस तक्रारींविरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात.

- प्रा. प्रवीण भोळे यांच्या सेवा पुस्तिकेवर या प्रकरणाची कोणतीही नोंद केली जाऊ नये.

- ज्या समाज विघातक घटकांनी विद्यापीठ परिसरात हिंसाचार केला आणि शैक्षणिक मूल्यमापनात बाधा आणली त्यांच्यावर विद्यापीठाने कायदेशीर कारवाई करावी.

- अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून कुलगुरूंनी ठोस पावले उचलावीत. त्यामुळे सर्व घटकांची सुरक्षा अबाधित राहील.

विद्यापीठात सातत्याने गोंधळ

विद्यापीठामध्ये यापूर्वी देखील विद्यार्थी संघटनेने गोंधळ, तोडफोड केली होती. त्यामुळे सातत्याने हा प्रकार विद्यापीठात होत आहे. अशा घटना थांबविणे आवश्यक असून, त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थी संघटनांनी तोडफोड न करता लोकशाही पद्धतीने व्यक्त होणे गरजेचे होते, अशी अपेक्षा विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड