शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोककलांचा आत्मा प्रबोधनाचा

By admin | Updated: May 11, 2017 04:04 IST

वासुदेव, कडकलक्ष्मी, भांड, बाळ-संतोष या सर्व लोकभूमिका काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहेत. लोककलावंतांनी कीर्तन, लोकनाट्य, गोंधळ,

वासुदेव, कडकलक्ष्मी, भांड, बाळ-संतोष या सर्व लोकभूमिका काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहेत. लोककलावंतांनी कीर्तन, लोकनाट्य, गोंधळ, जागरण, शाहिरीतून महाराष्ट्राला जागते ठेवले आहे. या कलांचे शरीर जरी मनोरंजन असले, तरी आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे संशोधन करीत संत आणि लोककलावंत, संतसाहित्य आणि लोककला असा सांस्कृतिक अनुबंध संशोधन, चिंतनाच्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसाहित्याचा विचार केला, तर लोककलांबाबतचे साहित्य मौखिक स्वरूपात आहे. या साहित्यास संहिताबद्ध, शब्दरूप उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात ललित साहित्याच्या चिंतनाला प्राधान्य देणार आहे, असे ज्येष्ठ भारुडकार, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगितले.जीवनानुभव सांगताना डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्ञानरुप ब्रह्मतत्त्व प्रेमरुप करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, तर प्रेमरुप भक्तितत्त्वाचेही वास्तववादी रूप मांडण्यासाठी तुकोबांची गाथा आहे. विठ्ठलभक्ती, अध्यात्मदर्शन याबरोबरच सामाजिक जीवनाचे उत्कट चिंतन घडवून त्यांनी जीवनाच्या वास्तवाकडे नेले आणि विवेकप्रामाण्यवादाची मांडणी केली. खरे तर ज्ञानदर्शन, भावदर्शन आणि शब्ददर्शन यातून उभे राहिलेले जीवनवादी विवेकदर्शन म्हणजेच संतसाहित्य. अध्यात्म, केवळ भक्तितत्त्व सांगण्यासाठी संतसाहित्य नाही, तर पर्यावरण, विज्ञान, सामाजिक जाणिवा, सामाजिक तत्त्वांचे सद्विचारदर्शन, जगण्यातली स्वाभाविकता, प्रतिकूलतेवर मात करण्याची भूमिका, शुद्ध जीवनप्रणाली अशा विविध अंगांनी लौकिक व्यवहारनीती जागवून संतसाहित्याने प्रवृती-निवृत्तीचा समन्वय साधला आहे. पण त्या भूमिकेतून संतसाहित्याचे समीक्षण झाले नाही. केवळ अध्यात्मदर्शी, भक्तिदर्शी साहित्य म्हणून ते बाजूला पडले. पण त्या भूमिकेतून संतसाहित्याचे समीक्षण झाले नाही. भक्तीचे मूळ सामाजिक एकात्मतेमध्ये आहे. हे परोपरीने समजावून दिले आणि कीर्तन, भजन, भारुड, वारी यांच्या आविष्कारातून भक्तीचे सामाजिकीकरण केले. आजच्या सामाजिकस्तरावरील समतेचा विचार करताना सामाजिक तत्त्वचिंतनाचा आद्य प्रवाह संतांच्याच आध्यात्मिक तत्त्वचिंतनातून उद्यास आला आहे. हे लक्षात येते. ऐहिक दु:खांचा व दैन्याचा विसर पाडून मनुष्याला कोणत्याही काल्पनिक वातावरणात गुंतवून संतांनी त्यांना भोळ्या भावनेत गुरफटून ठेवले नाही. भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाणघेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला. विवेकतत्त्वाची उधळण झाली आणि पंढरीच्या वाळवंटात खऱ्या अर्थाने ‘एकचि टाळी झाली’ या वाळवंटात खऱ्या अर्थाने उपेक्षितांचे मुकेपण संपले आणि चोखोबांसारखा संत आत्मविश्वासपूर्वक सांगू लागला. ज्ञानदेव म्हणजे सारस्वताचा शब्दसूर्य, तर तुकोबाराय म्हणजे अमृततत्त्वाचा वर्षाव करणारा पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र होय. या संत साहित्याचा आस्वाद कसा घ्यावा, त्यासाठी ज्ञानदेवांनीच एक सुंदर दृष्टांत दिला आहे.‘‘जैसे शारदेचिये चंद्रकळे, माजी अमृतकण कोवळे, ते वेचिती मनेमवाळे, चकोरतलगे’’ शरदऋतुच्या चांदण्यातील चंद्रकिरणांचे अमृत कण जशी चकोर पक्ष्याची पिले हळुवारपणे वेचतात आणि तृप्त होतात त्याच हळुवारपणे संतसाहित्याचा आस्वाद घ्यावा आणि तृप्त व्हावे. महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. संतांनी महाराष्ट्राला विवेकप्रामाण्यवाद दिला आणि त्या विवेकप्रामाण्यवादावर पुढे सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला. महाराष्ट्रात पत्रपंडित बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. महाराष्ट्राच्या लोकजीवनाला भक्तीच्या व्यासपीठावरूनही खरी सुधारण्याची आणि पुरोगामित्वाची शिकवण संतांनी दिली. म्हणून संतसाहित्याकडे माझी पाहण्याची भूमिका, विवेक प्रबोधनवादाचा आहे. तीन परंपरा महाराष्ट्रात आहेत. संत, लोकपरंपरा आणि सुधारकांचा महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या लोकभूमिका, पारंपरिक लोककला यातून एक लोकसंस्कृती उभी राहिली. त्या लोकभूमिका म्हणजे अंगणातील विद्यापीठ.’’ देखणे म्हणाले, ‘‘साहित्य आणि लोककला यांचे अद्वैत नाते आहे. संतसाहित्याचे समीक्षण करताना केवळ निवृत्तिवादी विचार मांडले गेले, पण संतसाहित्यामध्ये नगररचना, पर्यावरण, लोकजीवन, लोकांचा सामाजिक विवेक अशा प्रवृत्तीवादाच्या असंख्य वाटाही आहेत. प्रवृत्तीवाद आणि विवेक तत्त्वाच्या अंगाने संतसाहित्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’