शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विशेष मुलाखत- पुनर्मुद्रणातून साहित्य अजरामर राहील : सुनील मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:37 IST

आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देलेखकांचे संघटन आवश्यक

- प्रज्ञा केळकर-सिंग- मेहता पब्लिकेशनतर्फे सुमारे ५० पुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याबाबत सुनील मेहता यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने साधलेला संवाद-----* पुर्नमुद्रण प्रकल्पाचा उद्देश काय?- अनुवादित पुस्तकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील साहित्य वाचण्यासाठी वाचकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यामुळे जुन्या पुस्तकांचे पुर्नमुद्रण करण्याचा निर्णय घेतला. सध्या विजय तेंडुलकर यांची आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे. कोणत्याही भाषेतील क्लासिक्स अजरामर असतात. ती वाचकांपर्यंत पोहोचवणे प्रकाशकांचे काम आहे. १९६२-१९६५ या काळात अमेरिकेन सरकारने तेथील सर्वाधिक खपाची पुस्तके आणि क्लासिक्स यांचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रकल्प जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला होता.  ---------------कॉपी राईट कायद्याबद्दल काय सांगाल?- एखाद्या पुस्तकाचा कॉपी राईट ६० वर्षांपर्यंत संबंधित लेखक किंवा त्यांच्या वारसदारांकडे राहतो. त्यानंतर कॉपी राईट खुला होतो आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतला जातो. कॉपी राईटच्या मयार्देतील पुस्तकांबाबत लेखकाला न्याय मिळाला पाहिजे. पुस्तकांची नवी आवृत्ती किंवा पुर्नमुद्रण करताना लेखकाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. कॉपी राईट कायद्याबाबत लेखकांनी जागरुक असले पाहिजे. दोघांमध्ये रितसर करार झाला पाहिजे. त्यासाठी लेखकांचे संघटन होणे आवश्यक आहे.--------पुर्नमुद्रणाचे प्रमाण वाढण्यामागील कारण काय?- छपाईचे तंत्रज्ञान खूप अद्ययावत झाले आहे. पूर्वी हजारो प्रती काढून त्या गोदामात ठेवाव्या लागत होत्या. आता एका प्रतीपासून पाचशेपर्यंत कितीही प्रती प्रिंट आॅन डिमांड या तंत्रज्ञानामुळे छापता येऊ शकतात. पूवीर्ची काही पुस्तके आऊट आॅफ प्रिंट झालेली असतात, लेखक लोकप्रियतेच्या पडद्याआड गेलेला असतो. लेखकाला पुन्हा जिवंत करणे, वाचकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. त्यामुळेच पुर्नमुद्रण हाती घेतले जाते. पुस्तके छापील, ई बूक, आॅडिओ बूक अशा विविध स्वरुपात उपलब्ध होऊ शकतात.-----------------अनुवादाकडील कल वाढण्याचे कारण काय? मराठी पुस्तकांचा कमी अनुवाद होतो का?- आज मराठी भाषेमध्ये पूवीर्सारखे मेहनती लेखक उरलेले नाहीत. माझ्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या जाव्यात, असे प्रत्येक लेखकाला वाटत असते. मात्र, त्यासाठी प्रकाशक, लेखक आणि माध्यमांकडून प्रयत्न आवश्यक आहेत. पुस्तक प्रकाशन, सोशल मिडिया, विविध गावांत जाऊन कार्यक्रम, अभिवाचन, पुस्तक परिचय असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. विविध भाषांमधील साहित्य वाचकांना आवडू लागले आहे. मराठीच्या तुलनेत इंग्रजी साहित्य जास्त सरस आहे. सध्या युगंधर, महानायक, संभाजी, स्वामी, महात्मा ज्योतीराव फुले ही पाच पुस्तके अ‍ॅमेझॉनकडून इंग्रजीमध्ये अनुवादित करण्याचे काम सुरु आहे. मराठीतील पुस्तके इंग्रजीत गेलीच पाहिजेत; मात्र, त्याआधी ती विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली पाहिजेत. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य