शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

स्व: मूल्यांकन, ग्रुप स्टडीला विशेष महत्त्व : मनोज महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असे काही नसते. कारण ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असे काही नसते. कारण कोणत्याही प्रकारची माहिती, पार्श्वभूमी नसतानाही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळच्या गाळण बु. या खेडेगावातील शिक्षकाचा मुलगा मनोज सत्यवान महाजन यांनी २०१८ साली देशात १२५ वी रँक मिळवली. पहिल्या प्रयत्न अपयशानंतर कठोर मेहनत करत दुसऱ्या प्रयत्नात आरपीएफमध्ये आसिस्टंट कमांडन्ट, तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत तर चौथ्या प्रयत्नात थेट जिल्हाधिकारी पद मिळवले आहे. सध्या ते ओडिशा राज्यातील बालनगीर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

स्वतःचे क्षेत्र ओळखणे व त्याबरोबर वैयक्तिक व समाजाच्या परिस्थितीची जाण असणे. माझी ग्रामीण भागाची पार्श्वभूमी खूप उपयोगी पडली. माझे वडील शिक्षक, त्यामुळे अपुऱ्या पगारात त्यांनी प्रचंड कसरत करत आम्हा तीन भावंडाना उच्च शिक्षण दिले. मला या परिस्थितीची जाणीव होती. मात्र, माझ्यापेक्षा लहान भावाला जास्त होती. त्याने स्वतःचे स्वप्न १ वर्षे पुढे ढकलत मला आयएएस बनवण्यासाठी नोकरी केली. त्यामुळे या कठीण परिस्थितीची जाण ठेवत ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम केल्यानेच हे यश मिळाले.

* स्वाध्याय आणि ग्रुप स्टडी

स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि स्वतः केलेला अभ्यास. २०१५ च्या पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झालो नाही. तेव्हा अपयशाची कारणमीमांसा करताना आपला ग्रुपही आणि ग्रुप स्टडी चुकल्याचे लक्षात आले. यूपीएससीच्या परीक्षेत ग्रुप स्टडीला अनन्य साधारण महत्व आहे. अभ्यासक्रमामधील विविधता आणि व्याप ग्रुप स्टडीच्या माध्यमातून सहज अभ्यासता येतो. मग पुन्हा जोमाने अभ्यास केला. २०१६ ला संपूर्ण देशात ९०३ वी रँक आली. त्यात आरपीएफमध्ये आसिस्टंट कमांडन्ट बनलो. मात्र, आयएएस बनण्याची जिद्द कायम असल्याने पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. ग्रुप स्टडीमध्ये यशस्वी विद्यार्थी काय स्ट्रॅटेजीने अभ्यास करतात, त्याची देवाणघेवाण करत अभ्यास सुरू केला. एकमेकांच्या चुका सांगत, प्रोत्साहनामुळे आमच्या ग्रुपमधील दोन जिल्हाधिकारी, दोन पोलीस आयुक्त, दोन विदेश सेवेत आणि एक जण कस्टम सेवेत निवडले गेले.

* ज्ञानाचा प्रभावी वापर

एकंदरीत यूपीएससी ही परीक्षा दहावा-बारावी किंवा विद्यापीठ परीक्षेसारखी घोका आणि ओका याप्रमाणे नाही. या परीक्षेत मिळवलेल्या ‘ज्ञाना’पेक्षा त्याचा वापर कसा करतात हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत प्रत्येक विषयाचा व्याप पाहिला तर ज्ञान मिळवण्यासाठी २-२ वर्षे लागणार आहे. म्हणून ज्ञान मिळवण्यास २ गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय वाचायचे आणि दुसरे म्हणजे काय वाचायचे नाही. तर ज्ञान मिळवल्यानंतर ते वापारायचे कसे यासाठी लागते.

* ध्येय ठेवून सराव करणे (टार्गेटेड प्रॅक्टिस)

यूपीएससी परीक्षेत तीन (पायऱ्या) स्टेज असतात. प्रत्येक पायरीला वेगवेगळे कौशल्य लागतात आणि सराव लागतो. जसे पूर्वपरीक्षेसाठी वैकल्पिक प्रश्नांसाठी जास्तीत जास्त पेपर सोडवण्याच्या सराव लागतो. साधरणत: ५ हजार प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतर मुख्य परीक्षमध्ये मुक्त लेखक बनण्यापेक्षा मूल्यांकन करणे आणि पेपर सोडवून लेखन कौशल्य सुधारणे, त्यानंतर मुलाखतीसाठी आकर्षक पेहराव, स्पष्ट बोलणे, इंग्रजी सुधारणे, आरशासमोर बसून बोलणे, काही व्याख्याने ऐकणे आदी टार्गेटेड प्रॅक्टिस करावी लागते.

(फोटो : आयएएस मनोज महाजन या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)