शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मोबाइलवरून बोलणे धोकादायक; २९ हजार वाहनचालकांवर कारवाई, ५८ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:12 PM

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देमोबाइल केवळ फॅशन राहिला नसून झाली मूलभूत गरजमोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई

पुणे : मोबाइल हा आता आपल्या जीवनाचा भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू, अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असले तरीही वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ५८ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ फॅशन राहिला नसून ती मूलभूत गरज झाली आहे़ असे असले तरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही़ विशेषत: मोटार सायकल चालवताना  बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक हँड्स फ्री सिस्टीम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टँड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असले तर अपघाताचा धोका आणखीच वाढतो.

विना गिअरच्या गाड्या अधिक धोकादायकआता विना गिअरच्या दुचाकी गाड्यांचे प्रमाण वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी गाडी चालवता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवरील व्यक्ती काय बोलतेय, याकडे असते़ मोबाइलवर बोलणारी व्यक्ती आपल्या गाडीचा वेग कमी करते़ त्यात आजूबाजूच्या वाहनांचे आवाज व मागील वाहनांकडून वाजविले जाणारे व्हॉर्न यामुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते़ त्यातून अपघाताची शक्यता अधिक वाढते़ विना गिअरची गाडी चालविणारे वाहनचालक गाडी चालवत असताना व्हॉट्सअ‍ॅपवरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे ड्रायव्हिंगवरील संपूर्ण लक्ष उडालेले असते़ त्यामुळे अचानक कोणी मध्ये आल्यास अपघाताची दाट शक्यता असते़ 

टॅग्स :MobileमोबाइलPuneपुणे