शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोयाबीन खरेदी २ टक्केच, उद्दिष्ट होते १४ लाख टनांचे; शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले, आता खरेदी कोणती करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 08:31 IST

खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नसल्याने खरेदी कशी होईल असा प्रश्न आहे.

नितीन चौधरी

पुणे : हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या सरकारच्या उद्देशांना हरताळ फासण्यात आला आहे. नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या संस्थांना १४ लाख टनांचे उद्दिष्ट असताना २५ नोव्हेंबरपर्यंत २०६ केंद्रांवर केवळ २७ हजार ८२८ टन अर्थात २ टक्के सोयाबीनची खरेदी झाली. खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नसल्याने खरेदी कशी होईल असा प्रश्न आहे.

   गेल्या वर्षी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान दिल्यानंतर यंदा हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी ४,८९२ रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना देण्यात आले.

राज्यात ५० लाख टन उत्पादन ?

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र ५० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. प्रति हेक्टरी १० क्विंटल उत्पादन गृहीत धरले तरी राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादन होऊ शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

तरीदेखील राज्य सरकारने १४ लाख १३ हजार २७० टन खरेदीचे उद्दिष्ट दोन्ही संस्थांना दिले. ऐन काढणीच्या वेळेस राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. 

3 नाफेडने १ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. तर प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबरनंतरच झाली.