शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:24 IST

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे.

वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यातही अद्याप पावसाचे थेंब नसल्याने खरिपाच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यात या वर्षी सरासरी फक्त १० टक्केच खरिपाची पेरणी झालेली असून तेही मकाचे पिके घेण्यात आलेले असल्याने या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन पेरणीआभावी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.तालुक्यात दर वर्षी पाऊस पाठ फिरवत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालवली आहे. विहिरी, विंधनविहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ९० टक्के वेळेवर खरीपाची पेरणी झालेली होती. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण होते. या वर्षी हवामान खात्याने आवश्यकतेपेक्षा जास्तच पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आलेले असल्याने एप्रिल, मे महिन्यात शेतकºयांनी शेतावर मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसाचे आगमन झालेले होते.त्यामुळे शेतकºयांच्या खरिपाच्या पेरणीच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. परंतु जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडलाच नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जुलै महिन्यात पिके खुरपणीला येत असतात. परंतु अजूनही पेरणीच झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरीच्या जोरावर तालुक्यात १० टक्के जनावरांच्या चारापाण्यासाठी मका पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. अन्यथा खरिपाच्या पेरणीची तिफण चाललीच नसल्याने चिंता लागून राहिली आहे.दररोज डोक्यावर ढगांचे थैमान काळेकुट्ट ढग पाहावयास मिळत आहे. परंतु हुलकावणी देऊन निघून जात असल्याने शेतकºयाने अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. तालुक्यातील कृषी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वर्षी या महिन्यात संपूर्ण शंभर टक्के पेरणी करण्यात आलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, तूर पिके वंचित राहिली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस