शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:24 IST

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे.

वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यातही अद्याप पावसाचे थेंब नसल्याने खरिपाच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यात या वर्षी सरासरी फक्त १० टक्केच खरिपाची पेरणी झालेली असून तेही मकाचे पिके घेण्यात आलेले असल्याने या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन पेरणीआभावी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.तालुक्यात दर वर्षी पाऊस पाठ फिरवत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालवली आहे. विहिरी, विंधनविहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ९० टक्के वेळेवर खरीपाची पेरणी झालेली होती. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण होते. या वर्षी हवामान खात्याने आवश्यकतेपेक्षा जास्तच पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आलेले असल्याने एप्रिल, मे महिन्यात शेतकºयांनी शेतावर मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसाचे आगमन झालेले होते.त्यामुळे शेतकºयांच्या खरिपाच्या पेरणीच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. परंतु जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडलाच नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जुलै महिन्यात पिके खुरपणीला येत असतात. परंतु अजूनही पेरणीच झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरीच्या जोरावर तालुक्यात १० टक्के जनावरांच्या चारापाण्यासाठी मका पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. अन्यथा खरिपाच्या पेरणीची तिफण चाललीच नसल्याने चिंता लागून राहिली आहे.दररोज डोक्यावर ढगांचे थैमान काळेकुट्ट ढग पाहावयास मिळत आहे. परंतु हुलकावणी देऊन निघून जात असल्याने शेतकºयाने अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. तालुक्यातील कृषी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वर्षी या महिन्यात संपूर्ण शंभर टक्के पेरणी करण्यात आलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, तूर पिके वंचित राहिली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस