शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

धरणग्रस्तांना लवकरच जमिनींचे वाटप, ३८८ शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:23 IST

मुंबई हायकोर्टाच्या निकालानुसार भामा आसखेड ३८८ शेतकऱ्यांना शेतजमीन देण्याबाबतचे आदेशानुसार महसूल विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन पात्र शेतकऱ्यांची गेले तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी सौरभ राव

राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत खेड आणि दौंड तालुक्यात उपलब्ध जमिनींचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मार्गी लावणार आहे. त्यामुळे धरणग्रस्तांनी पुण्याला धरणातून पाणी नेण्यासाठी बंद केलेल्या जॅकवेलचे काम सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.पात्र, धरणग्रस्तांची जमिनी देण्याबाबतची नावांची यादी प्रांत कार्यालयात धरणग्रस्तांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली. याप्रसंगी पुनर्वसन तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार लतादेवी वाजे व धरणग्रस्त उपस्थित होते.

मुंबई हायकोर्टाच्या निकालानुसार भामा आसखेड ३८८ शेतकऱ्यांना शेतजमीन देण्याबाबतचे आदेशानुसार महसूल विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन पात्र शेतकऱ्यांची गेले तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह आताचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. तर संकलन रजिस्टर, कागदपत्रे एकत्रित करून धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत पुनर्वसन तहसीलदार कल्पना ढवळे, तत्कालीन तहसीलदार सुनील जोशी, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार आणि सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी योग्य तो पाठपुरावा केल्यामुळे धरणग्रस्तांचे अनेक मागण्या सुटल्या असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.

३८८ धरणग्रस्तांची यादी जाहीर केली असून ६५ टक्के रक्कम त्या काळातील रेडीरेकनरनुसार भरून घेण्यात आली होती. याबाबत कोणाची हरकती असेल तर ७ सप्टेंबरपर्यंत प्रांत कार्यालयात देण्यात याव्यात. २५ सप्टेंबरपर्यंत शेत जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता गावनिहाय पात्र धरणग्रस्तांचे जमीनवाटपासाठी २४ व ३० आॅगस्ट आणि ३ सप्टेंबरला गावोगावी बैठका घेतल्या जाणार आहेत. खेड तालुक्यात ३५ हेक्टर आणि दौंड तालुक्यात आवश्यक जमीन उपलब्ध केली आहे, तसेच प्रत्यक्ष ताबा दिला जाणार आहे. लाभक्षेत्राबाहेरील जमीन देण्याबाबतचा अधिकार शासनाचा असून त्याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे. जमिनी देताना धरणग्रस्तांचा सर्व आराखडा तयार करून प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. पुनर्वसित गावठाणातील सार्वजनिक विकासकामे, पाणी परवानगी, धरणग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यावसायिक कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. ९०० पेक्षा अधिक धरणग्रस्तांचे रखडलेल्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तयार होऊन शासनाला सादर केला आहे. याबाबत शासन लवकरच निर्णय घेऊन यामधून मार्ग निघणार आहे. ३८८ शेतकऱ्यांना दिल्या जाणारी जमिनीबाबत भोगवटा वर्ग २ शर्त लागू होऊन ही जमीन दहा वर्षे विकता येणार नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले.सहकार्य करण्याचे आवाहनधरणग्रस्तांनी आंदोलन न करता पाईपलाईनचे उर्वरित काम करू द्यावे. साठ लाख पुणेकरांची तहान त्याद्वारे भागणार आहे. या उपक्रमासाठी जागतिक बँकेचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबई