शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

By admin | Updated: April 4, 2016 01:19 IST

पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात

पुणे : पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांच्या लढ्याला बळ मिळाले. महिलांनी बोलले पाहिजे, वाचा फोडली पाहिजे, तेव्हाच समाज बदलेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले. स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली असून, मूलभूत हक्क-अधिकाराची यानिमित्ताने जाणीवजागृती झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली. माजी जिल्हा सरकारी वकील व या प्रकरणातील एक याचिकाकर्त्या अ‍ॅड. निलीमा वर्तक यांनी सांगितले की, महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे़ महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे या सर्व चुकीच्या गोष्टी असून याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहे. नाथपंथी असलेल्या एका मंदिरात महिलांना खुला प्रवेश दिला जातो आणि एका ठिकाणी नाही, हा भेदभाव आहे़ देवळांना हा नियम लागू आहे, आम्हाला नाही, असे त्यात म्हटले आहे़ ते बरोबर नाही़ न्यायालयाने आपल्या निर्णयात देवळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे असे म्हटले आहे़ ज्या मंदिरांचे सार्वजनिक ट्रस्ट आहेत़ त्यांनाही हा निर्णय लागू आहे़ ओंकारेश्वर मंदिर हे खूप जुने आहे़ त्याचा जुना तपशील पाहिला तर महिला नक्कीच तेथे पूजा करीत असतील, असे वाटते़ ‘‘न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच त्याबद्दल समाजमनाची मानसिकता तपासण्याचा लोकमतचा स्टिंग आॅपरेशनचा उपक्रम अभिनास्पद वाटला. महिलांनाही समान हक्क-अधिकार आहेत. असे असताना काही ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यापैकीच शनिशिंगणापूर असेल, अथवा त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आम्ही प्रातिनिधीक स्वरुपात हक्कासाठी लढाई लढत आहोत. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश खुला असला पाहिजे. खरं तर आधीच याबाबतचा निर्णय झालेला आहे. महिलांना प्रवेश बंदी केल्यास अथवा मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास अथवा दंडाची शिक्षा आहे,’’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जात आणि धर्मव्यवस्थेच्या प्रभावामुळे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क-अधिकार वापरता आले नाहीत. महिलांना आजच्या काळातही मंदिरात खुला प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रबोधनाबरोबरच महिलांना त्यांच्या हक्क-अधिकाराची जाणीव करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.‘‘शोषीत जनतेला नेहमीच न्याय हक्कासाठी लढाई करावी लागलेली आहे. कायद्याने सर्वांना समान अधिकार असला, तरी तो मिळविण्यासाठीही जनतेला लढाई करावी लागते, ही खेदाची बाब आहे. समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार सर्वांनी मान्य करायला हवा. जात आणि धर्म व्यवस्थेत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. त्या फुल्यांच्या पुण्यात महिलांना मंदिर प्रवेश नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. ‘लोकमत‘ने समाजासमोर वास्तव आणल्याने आता तरी महिला स्वत:हून पुढे येतील, अशी आशा वाटते,’’ असे सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे किशोर जाधव यांनी सांगितले.