शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

By admin | Updated: April 4, 2016 01:19 IST

पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात

पुणे : पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांच्या लढ्याला बळ मिळाले. महिलांनी बोलले पाहिजे, वाचा फोडली पाहिजे, तेव्हाच समाज बदलेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले. स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली असून, मूलभूत हक्क-अधिकाराची यानिमित्ताने जाणीवजागृती झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली. माजी जिल्हा सरकारी वकील व या प्रकरणातील एक याचिकाकर्त्या अ‍ॅड. निलीमा वर्तक यांनी सांगितले की, महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे़ महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे या सर्व चुकीच्या गोष्टी असून याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहे. नाथपंथी असलेल्या एका मंदिरात महिलांना खुला प्रवेश दिला जातो आणि एका ठिकाणी नाही, हा भेदभाव आहे़ देवळांना हा नियम लागू आहे, आम्हाला नाही, असे त्यात म्हटले आहे़ ते बरोबर नाही़ न्यायालयाने आपल्या निर्णयात देवळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे असे म्हटले आहे़ ज्या मंदिरांचे सार्वजनिक ट्रस्ट आहेत़ त्यांनाही हा निर्णय लागू आहे़ ओंकारेश्वर मंदिर हे खूप जुने आहे़ त्याचा जुना तपशील पाहिला तर महिला नक्कीच तेथे पूजा करीत असतील, असे वाटते़ ‘‘न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच त्याबद्दल समाजमनाची मानसिकता तपासण्याचा लोकमतचा स्टिंग आॅपरेशनचा उपक्रम अभिनास्पद वाटला. महिलांनाही समान हक्क-अधिकार आहेत. असे असताना काही ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यापैकीच शनिशिंगणापूर असेल, अथवा त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आम्ही प्रातिनिधीक स्वरुपात हक्कासाठी लढाई लढत आहोत. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश खुला असला पाहिजे. खरं तर आधीच याबाबतचा निर्णय झालेला आहे. महिलांना प्रवेश बंदी केल्यास अथवा मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास अथवा दंडाची शिक्षा आहे,’’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जात आणि धर्मव्यवस्थेच्या प्रभावामुळे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क-अधिकार वापरता आले नाहीत. महिलांना आजच्या काळातही मंदिरात खुला प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रबोधनाबरोबरच महिलांना त्यांच्या हक्क-अधिकाराची जाणीव करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.‘‘शोषीत जनतेला नेहमीच न्याय हक्कासाठी लढाई करावी लागलेली आहे. कायद्याने सर्वांना समान अधिकार असला, तरी तो मिळविण्यासाठीही जनतेला लढाई करावी लागते, ही खेदाची बाब आहे. समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार सर्वांनी मान्य करायला हवा. जात आणि धर्म व्यवस्थेत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. त्या फुल्यांच्या पुण्यात महिलांना मंदिर प्रवेश नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. ‘लोकमत‘ने समाजासमोर वास्तव आणल्याने आता तरी महिला स्वत:हून पुढे येतील, अशी आशा वाटते,’’ असे सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे किशोर जाधव यांनी सांगितले.