शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

By admin | Updated: April 4, 2016 01:19 IST

पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात

पुणे : पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांच्या लढ्याला बळ मिळाले. महिलांनी बोलले पाहिजे, वाचा फोडली पाहिजे, तेव्हाच समाज बदलेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले. स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली असून, मूलभूत हक्क-अधिकाराची यानिमित्ताने जाणीवजागृती झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली. माजी जिल्हा सरकारी वकील व या प्रकरणातील एक याचिकाकर्त्या अ‍ॅड. निलीमा वर्तक यांनी सांगितले की, महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे़ महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे या सर्व चुकीच्या गोष्टी असून याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहे. नाथपंथी असलेल्या एका मंदिरात महिलांना खुला प्रवेश दिला जातो आणि एका ठिकाणी नाही, हा भेदभाव आहे़ देवळांना हा नियम लागू आहे, आम्हाला नाही, असे त्यात म्हटले आहे़ ते बरोबर नाही़ न्यायालयाने आपल्या निर्णयात देवळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे असे म्हटले आहे़ ज्या मंदिरांचे सार्वजनिक ट्रस्ट आहेत़ त्यांनाही हा निर्णय लागू आहे़ ओंकारेश्वर मंदिर हे खूप जुने आहे़ त्याचा जुना तपशील पाहिला तर महिला नक्कीच तेथे पूजा करीत असतील, असे वाटते़ ‘‘न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच त्याबद्दल समाजमनाची मानसिकता तपासण्याचा लोकमतचा स्टिंग आॅपरेशनचा उपक्रम अभिनास्पद वाटला. महिलांनाही समान हक्क-अधिकार आहेत. असे असताना काही ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यापैकीच शनिशिंगणापूर असेल, अथवा त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आम्ही प्रातिनिधीक स्वरुपात हक्कासाठी लढाई लढत आहोत. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश खुला असला पाहिजे. खरं तर आधीच याबाबतचा निर्णय झालेला आहे. महिलांना प्रवेश बंदी केल्यास अथवा मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास अथवा दंडाची शिक्षा आहे,’’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जात आणि धर्मव्यवस्थेच्या प्रभावामुळे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क-अधिकार वापरता आले नाहीत. महिलांना आजच्या काळातही मंदिरात खुला प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रबोधनाबरोबरच महिलांना त्यांच्या हक्क-अधिकाराची जाणीव करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.‘‘शोषीत जनतेला नेहमीच न्याय हक्कासाठी लढाई करावी लागलेली आहे. कायद्याने सर्वांना समान अधिकार असला, तरी तो मिळविण्यासाठीही जनतेला लढाई करावी लागते, ही खेदाची बाब आहे. समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार सर्वांनी मान्य करायला हवा. जात आणि धर्म व्यवस्थेत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. त्या फुल्यांच्या पुण्यात महिलांना मंदिर प्रवेश नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. ‘लोकमत‘ने समाजासमोर वास्तव आणल्याने आता तरी महिला स्वत:हून पुढे येतील, अशी आशा वाटते,’’ असे सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे किशोर जाधव यांनी सांगितले.